आढावा विधानसभा निवडणुकांचा
1952 : पहिल्याच निवडणुकीत वसंतदादांची विधानसभेत एन्ट्री
वसंतदादां, कळंत्रे आक्का, गुंडू दशरथ पाटील, दत्ताजीराव सूर्यवंशी, एस. डी. पाटील, सरोजिनी बाबर निवडून आल्या. दिनेशकुमार ऐतवडे, सांगली 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. नव्या युगाची नवी सुरुवात झाली. अजून देशात लोकशाही स्थिरस्थावर झाली नव्हती आणि प्रांत रचनाही झाली नव्हती, परंतु इंग्रजांनी करून ठेवलेल्या वेगवेगळ्या प्रांताने भूभाग ओळखला जायचा. मुंबई प्रांतही त्यातीलच एक भाग.