dudhgaon crime news : दुधगाव मध्ये तरुणावर चाकूने वार करत बेदम मारहाण : दोघांवर गुन्हा दाखल. : सांगली : मिरज तालुक्यातील दुधगाव मध्ये जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने वार करून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. सदरचा प्रकार हा रविवार दि. 27 एप्रिल रोजी रात्री पाऊणे आठ वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी जखमी विशाल प्रकाश गुरव (वय 26 रा. दुधगाव) याने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणार्या निखिल भोकरे आणि प्रशांत चिले (दोघे रा. दुधगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
dudhgaon crime news : दुधगाव मध्ये तरुणावर चाकूने वार करत बेदम मारहाण : दोघांवर गुन्हा दाखल.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जखमी विशाल गुरव हा आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील दुधगाव गावामध्ये राहतो. संशयित दोघेजण देखील याच परिसरात राहतात. जखमी गुरव आणि संशयित चिली या दोघांमध्ये पूर्वीपासून वाद आहेत.
काही दिवसांपूर्वी गाडी लावण्यावरून देखील दोघांमध्ये वाद झाला होता. रविवारी रात्री पाऊणे आठ वाजण्याच्या सुमारास जखमी गुरव हा गावातील दुधगाव चावडी चौक येथे थांबला होता. यावेळी संशयित दोघेजण मोटारसायकलवरून आले. त्यांनी तू आमची आब्रू घालवली आहेस, आतापर्यंत तू वाचला आहेस असे म्हणून निखिल भोकरे याने त्याच्या जवळ असलेल्या चाकूने गुरव याच्या डोक्यात आणि कानावर वार केले.
dudhgaon-crime-news-a-young-man-was-brutally-beaten-with-a-knife-in-dudhgaon-a-case-has-been-registered-against-both
यानंतर दोघांनी मिळून गुरव यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. घडलेल्या या प्रकारानंतर जखमी गुरव याने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणार्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.