rajkiyalive

HATKANANGALE LOKSABHA : राजू शेट्टी 15 रोजी अर्ज भरणार

जयसिंगपूर/ जनप्रवास
माझ्या विरोधात साखर कारखानदार बहुसंख्य उमेदवार देऊन षडयंत्र करत आहेत. ’माझा उमेदवारी अर्ज येत्या 15 एप्रिलला दाखल करणार असून, प्रस्थापित नेत्यांना या निवडणुकीत जनतेच्या बळावर दोन्ही उमेदवारांना अस्मान दाखवणार असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले.

 

HATKANANGALE LOKSABHA : राजू शेट्टी 15 रोजी अर्ज भरणार

साखर कारखानदारांचे माझ्या विरोधात षडयंत्र

उदगाव (ता. शिरोळ) येथे कल्पवृक्ष मगार्डन येथे संकल्प मेळाव्यात माजी खासदार शेट्टी बोलत होते. महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणामुळे भूमिअधिग्रहण कायद्यात बदल करून शेतकर्‍यांना हजारो कोटी नुकसानीत घातले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले की, ’माझा उमेदवारी अर्ज येत्या 15 एप्रिलला बैलगाडीतून जाऊन भरणार आहे. शिवसेनेने पक्षात येण्याची अट घातली होती. गेली 30 वर्षे मला जनतेने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. असे असताना मी गद्दारी करून शिवसेनेत कसा प्रवेश करू. लोकसभा निवडणुकीत आमच्या विरुद्ध कारखानदार अशीच लढत होणार आहे. साखर कारखानदारांना माझ्या आंदोलनामुळे 600 कोटी रूपये शेतकर्‍यांना जादा द्यावे लागले. त्याचा राग साखर कारखानदार लोकसभेच्या निवडणुकीत काढत आहेत.

ते पुढे म्हणाले, सत्यजीत पाटलांची उमेदवारी हे त्यांचेच षडयंत्र आहे. शेतकरी जोपर्यंत माझ्या पाठिशी आहेत, तोपर्यंत मला कशाची भिती नाही. प्रस्थापितांना जनता धडा शिकवून क्रांती घडेल, शक्तिपीठ महामार्गातून शेतकर्‍यांची 27 हजार हेक्टर जमीन संपादीत करून त्यांना देशोधडीला सरकार लावत असेल तर मी हे सहन करणार नाही. जनता माझ्याच पाठिशी आहे. सत्यजीत पाटील व धैर्यशील माने हे साखर कारखानदारांचे हस्तक आहेत. त्यांना निवडणुकीत धडा शेतकरी धडा शिकवतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रा. जालधंर पाटील म्हणाले, सत्यजीत पाटील व धैर्यशील माने हे साखर कारखानदारांचे प्यादे आहेत. एकनिष्ठ सत्यजीत पाटील शिवसेना फुटीवेळी गोव्यात बॅग भरून का गेले होते. त्यांच्या हातात झेंडा शिवसेनाचा व दांडा मात्र काँग्रेसचा असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. यावेळी लोकांनी 21 लाख 80 हजार रूपये लोकवर्गणी गोळा करून राजू शेट्टी यांना दिली. यामध्ये नांदणी गावाने 11 लाख रूपये दिले.
यावेळी सावकर मादनाईक, वैभव कांबळे, पोपट मोरे, विठ्ठल मोरे, सागर संभूशेटे, शैलेश आडके, जयकुमार कोले, शमशुद्दीन संदे, संदीप राजोबा, श्रीवर्धन पाटील, राम शिंदे, अण्णासो चौगुले उपस्थित होते.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज