rajkiyalive

islampur news : जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने 10 हजार भावांना राख्या

इस्लामपूर :

islampur news : जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने 10 हजार भावांना राख्या : सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इस्लामपूर, आष्टा शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात 10 हजार भावांना राख्या बांधून अनोख्या पध्दतीने भावा बहिणींच्या अतूट नात्याची जपणूक केली आहे. जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात रक्षाबंधनचा सण साजरा केला आहे. जिल्ह्यातील महिला पदाधिकारी व विविध घटकातील भावांनी त्यांना तितक्या च उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या उपक्रमाचे जिल्ह्यातून कौतुक केले जात आहे.

islampur news : जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने 10 हजार भावांना राख्या

महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील सांगली,मिरज, पलूस,कडेगाव,शिराळा,तासगाव,जत,कवठे महांकाळ,विटा आदी तालुक्यात हा उपक्रम राबविला आहे. तर वाळवा तालुक्यात इस्लामपूर,आष्टा शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावात हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. या उपक्रमास विविध घटकातील भावांनीही तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

सुनिता देशमाने वाळवा,साधना पाटील शिराळा,नंदा पाटील पलूस,वैशाली मोहिते कडेगाव,सुवर्णा पाटील खानापूर,मोनिका पाटील आटपाडी,स्मिता पाटील मिरज, मीनाक्षी माने क.महांकाळ, मिनाक्षी अक्की जत या तालुकाध्यक्षांच्यासह प्रदेश सदस्या कमल पाटील,जिल्हा उपाध्यक्षा अलका माने,माजी शहराध्यक्षा रोझा किणीकर, जिल्हा प्रतिनिधी प्रतिभा पाटील,शैलजा जाधव,संघाच्या संचालिका उज्वला पाटील, इस्लामपूर शहराध्यक्षा पुष्पलता खरात,आष्टा शहराध्यक्षा तेजश्री बोंडे,रंजना पाटील,हर्षदा कदम,नयना पाटील,तसेच महिला कार्यकर्त्यां नी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज