rajkiyalive

jain samaj news : आवाडेसाहेब हे वागणं बरं नव्हं..।

jain samaj news : आवाडेसाहेब हे वागणं बरं नव्हं..। : दक्षिण भारत जैन सभा ही एक शतकाहून अधिक इतिहास असलेली संस्था असून, या संस्थेच्या अध्यक्ष पदासाठी नुकतीच निवडणूक पार पडली. अनेक वर्षांपासून सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेल्या या संस्थेने अनेक मोठे नेते, समाजसेवक घडवले आहेत. यंदाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भालचंद्र पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि समाजातील योगदानावर एकमुखाने विश्वास ठेवत बहुसंख्य सभासदांनी त्यांना मतदान केले. परंतु निवडीनंतर आवाडे समर्थकांनी येवून घातलेला गोंधळामुळे या निवडीला गालबोट लागले. आवाडेसाहेब तुमचे हे वागणं बरं नव्हे….

jain samaj news : आवाडेसाहेब हे वागणं बरं नव्हं..।

मात्र, ही निवड शांततेत आणि सन्मानाने पार न पडता, एका दुर्दैवी वादावादीची छाया तिच्यावर पडली. निवडणूक निकाल जाहीर होताच, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या समर्थकांनी सभास्थळी गोंधळ घातला, आवाज वाढवला आणि सभेचे वातावरण तणावपूर्ण केले. ही बाब संपूर्ण जैन समाजासाठी खेदजनक आणि लाजिरवाणी होती.

जैन समाज हा अहिंसेचे, संयमाचे आणि शांतीचे प्रतीक मानला जातो. अशा शांतताप्रिय समाजात राजकारणाचा शिरकाव होणे, वाद निर्माण होणे, हे समाजाच्या प्रतिष्ठेला डाग लावणारे आहे. भालचंद्र पाटील हे समाजातील एक कर्तृत्ववान आणि निस्वार्थी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांची निवड समाजाने लोकशाही मार्गाने, पारदर्शक पद्धतीने केली. या निवडीत कोणत्याही प्रकारचा पक्षपात झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.

सभेच्या 80 पदाधिकार्‍यांपैकी 65 पदाधिकार्‍यांनी भालचंद्र पाटील यांच्या बाजूने हात उंचावले. अशा वेळी, केवळ केवळ आपले कार्यकर्ते डि. ए. पाटील निवडून आले नाहीत म्हणून त्याचा राग समाजावर काढणे, सभेचे वातावरण बिघडवणे, हे अत्यंत चुकीचे आहे. प्रकाश आवाडे हे एक अनुभवी राजकारणी आहेत. त्यांच्याकडून समाज अधिक जबाबदारीची आणि संयमाची अपेक्षा करतो. त्यांच्या समर्थकांनी केलेल्या गोंधळामुळे त्यांच्या प्रतिमेला आणि समाजातील एकतेला धक्का बसला आहे.

प्रकाश आवाडे यांनी या प्रकरणी स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे. जर हा प्रकार त्यांच्याच सूचनेवर झाला असेल, तर ते समाजाच्या भविष्याशी खेळत आहेत. आणि जर त्यांच्या नकळत झाला असेल, तरी त्यांनी आपल्या समर्थकांना आवर घालणे अपेक्षित आहे. कार्य करणार्‍या व्यक्तीला अडवणे ही कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी घातक गोष्ट आहे. भालचंद्र पाटील यांच्यासारख्या सज्जन व्यक्तीची बदनामी करण्याचा प्रयत्न समाज सहन करणार नाही.

आज जैन समाजाला एकत्र येऊन, शांततेने, विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे. असे प्रसंग समाजात फूट निर्माण करतात. म्हणूनच, हे वादविवाद, राग आणि ईर्षा बाजूला ठेवून सर्वांनी भालचंद्र पाटील यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. समाज त्यांच्याकडून आशा ठेवून आहे आणि अशा वादांमध्ये अडकून राहणे हा समाजाच्या विकासाचा अपमान आहे.

jain-samaj-news-mr-awades-behavior-was-not-good

समाज हा व्यक्तींपेक्षा मोठा असतो, आणि कोणतेही वैयक्तिक राग किंवा महत्वाकांक्षा समाजाच्या हिताच्या आड येता कामा नये. समाज हे सर्व पाहत असतो, आणि चुकीचे वर्तन करणार्‍यांना तो वेळोवेळी योग्य उत्तर देतोच.
शेवटी, हे लक्षात ठेवले पाहिजे की – एकजूट आणि सकारात्मक कार्य हेच समाज उन्नतीचे खरे साधन आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज