rajkiyalive

JAYANT PATIL NCP : अजितदादांबरोबर गेलेल्या नाराजांचे मनधरणीसाठी जयंतरावांचे प्रयत्न

 JAYANT PATIL NCP : अजितदादांबरोबर गेलेल्या नाराजांचे मनधरणीसाठी जयंतरावांचे प्रयत्न : महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांची पकड सैल करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटातील अनेक मोहरे गळाला लावले. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना धक्का बसला. त्यांनी नाराजांची मनधरणी सुरू केली आहे. त्या संदर्भात दोन बैठका देखील झाल्या आहेत. त्यामुळे माजी नगरसेवक कोणती भूमीका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

JAYANT PATIL NCP : अजितदादांबरोबर गेलेल्या नाराजांचे मनधरणीसाठी जयंतरावांचे प्रयत्न

 

जनप्रवास । सांगली

सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. अजितदादा उपमुख्यमंत्री झाले तर काही आमदारांना मंत्रीपदे मिळाली. त्यांनतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले. शरद पवार व अजित पवार यांनी आपल्या गटाची ताकद वाढविण्यासाठी राज्यात मेळावे, सभा, बैठका सुरू केल्या. नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी देखील झाल्या. राज्यातील या फुटीचा परिणाम सांगली ग्रामीण व शहरी भागात झाला. मनपा क्षेत्रातून माजी महापौर इद्रिस नायकवडी, दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक पद्माकर जगदाळे आदींनी अजितदादा गटात प्रवेश केला. या पदाधिकार्‍यांनी पहिला धक्का काही दिवसांपूर्वी दिला. माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी नगरसेवक विष्णू माने यांनी अजितदादा पवार यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याबरोबर 13 माजी नगरसेवक देखील दूरध्वनीवरून सहभागी होते.

त्यामुळे महापालिका क्षेत्रात आ. जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.

महापालिकेच्या निवडणुका किमान वर्षभर लांबणीवर पडल्या आहेत. मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे नाराजांची मनधरणी करून त्यांना प्रवेशापासून रोखणे आवश्यक आहे. यासाठी आ. जयंत पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. माजी महापौर इद्रिस नायकवडी हे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तर पद्माकर जगदाळे यांना महापालिका क्षेत्राचे अध्यक्षपद दिले आहे. माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांची नुकतीच राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे हे तिघे स्वगृही परतण्याची शक्यता देखील कमी आहे.

मात्र माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी नगरसेवक विष्णू माने आदी माजी नगरसेवकांसाठी आ. जयंत पाटील प्रयत्न करत आहेत.

अद्याप या नगरसेवकांनी जाहीर प्रवेश केला नाही. त्यामुळे त्यांना थांबविणे शक्य आहे. शिवाय माजी महापौर इद्रिस नायवकडी यांनी माजी महापौर बागवान व स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश आवटी यांना अजितदादा गटात घेण्यास विरोध केला आहे. त्यामुळे बागवान यांचा प्रवेश थांबू शकतो. बागवान यांचा प्रवेश थांबला तर अनेक माजी नगरसेवक देखील थांबतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे आ. जयंत पाटील यांनी नाराजांची मनधरणी सुरू केली आहे.

सांगली शहरात स्व. राजारामबापू पाटील पूर्णाकृती अनावरणचा कार्यक्रम नुकताच पार पडला.

या कार्यक्रमासाठी या नाराजांना निमंत्रित केले होते. नाराज देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्याच्या दुसर्‍या दिवशी आ. जयंत पाटील यांनी नाराजांबरोबर चर्चा केली. या नाराजांनी पक्षातील काही व्यक्तिंच्या तक्रारी आ. जयंत पाटील यांच्यासमोर मांडल्या. आ. पाटील यांनी पक्षात काही बदल करू, अशी ग्वाही देखील त्यांना दिली. शिवाय दुसर्‍या टप्प्यात पुन्हा चर्चा होणार आहे. या चर्चेसाठी माजी नगरसेवकांनी होकार दिला आहे. त्यामुळे त्यांचा पक्ष प्रवेश थांबणार का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज