rajkiyalive

jayant patil news : आपण थेट संपर्क करा,तातडीने लक्ष घालू ; प्रतिकदादा पाटील

jayant patil news : आपण थेट संपर्क करा,तातडीने लक्ष घालू ; प्रतिकदादा पाटील आम्ही आपले प्रश्न,अडचणी लिहून घेतले आहे. या अडचणींचा पाठपुरावा करून त्या नक्की सोडवू. आपण विश्वास ठेवा,येत्या काही दिवसात तुम्हाला निश्चित बदल दिसेल, असा विश्वास राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी ऊस उत्पादकांच्या संपर्क दौऱ्यात बोलताना व्यक्त केला. आपला ऊस तोडीपासून कारखान्याच्या संबंधी कोणताही प्रश्न असू द्या,आपण थेट संपर्क करा,तातडीने लक्ष घालू,अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

    प्रतिकदादा पाटील यांनी जक्राईवाडी, लाडेगाव,ऐतवडे बु: व वशी आदी गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद करून त्यांचे प्रश्न समजून घेतले. या दौऱ्यात संचालक दीपक पाटील,अमरसिंह साळुंखे, रावसाहेब पाटील,सचिव डी.एम.पाटील,ऊस पुरवठा अधिकारी नितीन पाटील,गटाधिकारी प्रणिल पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी सहभागी झाले होते.
     प्रतिकदादा पाटील म्हणाले,गेल्या हंगामात आमच्या तोडणी यंत्रणेकडून ज्या काय चुका झाल्या असतील,त्या आपण या हंगामात नक्की दुरुस्त करू. आपणास फारसा त्रास होणार नाही,याची दक्षता घेऊ. आपण काळजी करू नका. आम्ही आपल्या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना सुरू केल्या आहेत,या योजनांचा आपण आवश्य लाभ घ्यावा. आपण पिकविलेला ऊस आपल्या कारखान्यास घालून सहकार्य करावे.
    दीपक पाटील म्हणाले,लोकनेते राजाराम बापू पाटील,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी साखर कारखाना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यामधील जिव्हाळ्याचे नाते कायम जपले आहे. प्रतिकदादा पाटील हा वसा व वारसा तिसऱ्या पिढीत जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपण त्यांना साथ देऊ या.

jayant-patil-news-please-contact-us-directly-we-will-look-into-it-urgently-pratikdada-patil

   ऐतवडे बु:चे सरपंच सुभाष कुंभार,शहाजी गायकवाड,राजेंद्र दिंडे,उपसरपंच संदीप गायकवाड,कलगोंडा पाटील,नंदकुमार
गायकवाड,महेश कांबळे, प्रमोद गायकवाड, लाडेगावचे श्रीपती पाटील,सुखदेव पाटील, उपसरपंच हौसराव दाईगडे,सर्जेराव निंबाळकर,प्रतापसिंह पाटील,शिवाजी पाटील,अमोल पाटील,वशी येथे प्रशांत पाटील,भगवान पाटील,जगन्नाथ पाटील, अमृत पाटील,जक्राईवाडीचे सरपंच दिग्विजय माने,निवास गायकवाड,प्रदीप गायकवाड, सुनिल गायकवाड,बाजीराव गायकवाड यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज