rajkiyalive

MANSINGRAO NAIK NEWS : माझ्यासह राष्ट्रवादीच्या बारा आमदारांची मते जयंत पाटलांनाच

जनप्रवास । सांगली
MANSINGRAO NAIK NEWS : माझ्यासह राष्ट्रवादीच्या बारा आमदारांची मते जयंत पाटलांनाच : विधानपरिषद निवडणुकीत माझ्यासह राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार गटातील बारा आमदारांनी शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) उमेदवार जयंत पाटील यांनाच मते दिल्याची माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी मंगळवारी दिली. पराभवाचे खापर कोणावर तरी फोडायचे, म्हणूनही आरोप केल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

MANSINGRAO NAIK NEWS : माझ्यासह राष्ट्रवादीच्या बारा आमदारांची मते जयंत पाटलांनाच

आ. मानसिंगराव नाईक यांची माहिती

विधानपरिषदेच्या निवडणूक निकालाच्या दुसर्‍या दिवशी शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांनी शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी मला मतदान दिले नाही, असा आरोप प्रसार माध्यमांशी बोलताना केला होता. याबाबत बोलताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले की, मतदान झाल्याच्या दुसर्‍या दिवशी शेकापचे विधानपरिषदेचे उमेदवार पाटील यांनी मी मतदान केले नसल्याचे सांगितले. त्या दिवशी माझी आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची चर्चा झाली.

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी आरोपावर थेट चर्चा न करता मी बोलतो, असे सांगितले. दुसर्‍या दिवशी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शेकापचे विधानसभेचे उमेदवार जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली. आमच्या सर्व आमदारांनी आपणास मते दिली असताना आमच्या आमदारांवर केलेल्या आरोपाबाबत जाब विचारला. तुम्ही कोणत्या आधारावर आरोप करता ते दाखवून द्यावे, अशी विचारणा केली. त्यावर त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही.

आ. नाईक म्हणाले, माझ्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सर्व म्हणजे 12 आमदारांनी त्यांना मतदान केले आहे. त्यांनी त्यांना मिळालेल्या मताची बेरीज पाहिली तर त्यांना राष्ट्रवादी सोडून अन्य कोणत्या पक्षाचे मत पडले हे सांगणे गरजेचे होते. त्यांच्या दुसर्‍या दिवशी काही खुलासा केल्याचे समजते. मात्र खुलासा करण्यापुर्वी आरोप करणे चुकीचे आहे. पराभवाचे खापर कोणावर तरी फोडायचे, म्हणूनही आरोप केला आहे. शिवाय मुंबईतील काही राजकीय मंडळीकडूनही हेतुपुरस्कर आरोप करायला लावला जाण्याची शक्यता वाटते. माझ्यादृष्टीने हा विषय त्याच दिवशी संपलेला असल्याचे सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज