miraj crime news : बेळंकीत अडीच हजारांची लाच घेणारे तलाठी आणि कोतवाल जेरबंद : सात – बारा उतार्यावर खरेदी केलेल्या प्लॉटची नोंद करण्यासाठी तलाठी आणि स्वत:करिता 2 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताना बेळंकी येथील कोतवालास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवार दि. 3 रोजी बेळंकी येथील तलाठी कार्यालय परिसरात करण्यात आली.
miraj crime news : बेळंकीत अडीच हजारांची लाच घेणारे तलाठी आणि कोतवाल जेरबंद
सात बारा उतार्यावर नोंद करण्यासाठी घेतली लाच.
तलाठी विद्यासागर सदाशिव चव्हाण (वय 50, रा. फ्लॅट क्र. 104, रघुकुल अपार्टमेंट, ब्राह्मणपुरी, मिरज) आणि कोतवाल राजाराम धनपाल वाघमारे (वय 53, रा. बौध्द मंदिरानजीक, बेळंकी, ता. मिरज ) या दोघांवर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांच्या भावाने प्लॉट खरेदी केला होता. सात – बारा उतार्यावर त्याची नोंद करण्यासाठी तक्रारदार यांनी कोतवाल राजाराम वाघमारे याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी वाघमारे याने तलाठी विद्यासागर चव्हाण याच्याकडून नोंद करुन घेण्यासाठी स्वत: आणि तलाठी यांच्याकरिता 2 हजाार 500 रुपयांची मागणी केली. याबाबत दि. 2 जुलै रोजी तक्रारदार यांनी याबाबतचा तक्रार अर्ज लाचलुचपत प्रतिबंधक विभागास दिला होता.
त्यानुसार पडताळणी केली असता त्यामध्ये सत्यता असल्याचे निदर्शनास आले. गुरुवार दि. 3 रोजी पथकाने बेळंकीच्या तलाठी कार्यालय परिसरात सापळा रचला. यावेळी तलाठी विद्यासागर चव्हाण यांच्या कार्यालयासमोर तक्रारदार यांच्याकडून 2 हजार 500 रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने कोतवाल वाघमारे यास रंगेहाथ पकडले. पथकाने केलेल्या चौकशीत, तक्रारदार यांच्या भावाच्या प्लॉटची सात – बारावर नोंद होण्यासाठी तलाठी विद्यासागर चव्हाण याने तक्रारदार यांना लाचेची रक्कम संशयित कोतवाल राजाराम वाघमारे याला देण्यासाठी प्रोत्साहित केल्याचे निष्पन्न झाले.
miraj-crime-news-talathi-and-kotwal-arrested-for-taking-bribe-of-rs-2-500-in-belanki
लाचलुचपत विभागाने दोघांनाही ताब्यात घेतले आहे. दोघांवरही मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस उपअधिक्षक अनिल कटके, पोलीस निरिक्षक विनायक भिलारे आणि किशोर खाडे, पोलीस कर्मचारी ऋषिकेश बडणीकर, प्रीतम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, उमेश जाधव, सीमा माने आदींनी सहभाग घेतला.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.