rajkiyalive

नांद्रेत चर्चा केवळ कपबशीचीच

 

dineshkumar aitawade  9850652056

मिरज तालुक्यातील नांद्रे येथे ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची वाटत असताना सत्ताधार्‍यांकडे झुकताना दिसत आहे. सामाजिक कार्यकर्ते असणार्‍या महावीर भोरे यांच्या पत्नी सौ. पूजा भोरे यांना सरपंचपदाची तिकीट दिल्याने युवा वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महावीर भोरे यांची अगोदरपासूनच नांद्रेत क्रेझ असल्याने युवा वर्ग झाडून पूजा भोरे यांच्या प्रचारार्थ उतरला आहे. पूजा भोेरे यांचे चिन्ह कपबशी आहे. त्यामुळे नांद्रेत सर्वत्र कपबशीचीच हवा झाली आहे. सोशल मिडीयावरही कपबशी धुमाकूळ घालत आहे.

नांद्रेतील निवडणूक सहा वर्षानंतर होत आहे. सत्ताधारी गटाने गेल्या पाच वर्षात अनेक विकासाभिमुख कामे केली आहेत. पाच वर्षापैकी दोन वर्षे कोरोना आणि पुरामध्येच गेली आहेत. तरीही सत्ताधार्‍यांनी गावामध्ये चांगले काम केले आहे. एन. एस. पाटील पतसंस्थेने आपल्या सभासदांना कायमच 15 टक्के लाभांश देत आली आहे. परंतु कोरोना काळात आपल्या सभासदांचे आरोग्यामुळे हाल होवू नयेत म्हणून 30 टक्के लाभांश दिला आहे. सर्वच पाणीपुरवठा संस्थांमुळे सभासद वर्ग खुष आहे. महावीर भोरे यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांला उमेदवारी दिल्याने सत्ताधार्‍यांना हत्तीचे बळ आले आहे. महावीर भोरे यांनी सोसायटीमध्येही चेअरमन म्हणून चांगले काम केले आहे.

पॅनेलप्रमुख एन. एस. पाटील, राजगोंडा पाटील गुमट आणि स्व. महावीर पाटील गटाचे अमित पाटील यांना मानणारा मोठा गट गावामध्ये आहे. या तीन्ही नेत्यांनी चांगल्या उमेदवांची निवड केली आहे. राजगोंडा पाटील यांनी आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा या गटाला फायदा होणार आहे. एन. एस. पाटील यांचे आजपर्यंतचे गावासाठी असणारे योगदानही गावकरी विसरले नाहीत.

पहिल्या टप्प्यात सत्ताधारी पाटील गट, ग्रामविकास पॅनेल प्रचारात आघाडी घेतली आहे. सरपंचपदाचे उमेदवार सौ. पूजा भोरे आणि महावीर भोरे हे आपली भूमिका सर्वसामान्य लोकांना पटवून देण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. ग्रामविकास पॅनेलने पहिल्या टप्प्यात प्रचारावर जोर दिला आहे. सत्ताधारी ग्रामविकास पॅनेलने चांगले आणि उच्चशिक्षित उमेदवार दिले आहेत. ही त्यांची जमेची बाजू आहे.

हेही वाचा

हरिपूरमध्ये एकहाती भाजपला मतविभागणीचा धोका
नांद्रेत सत्ताधार्‍यांची प्रचारात आघाडी
हरिपूर, नांद्रेमध्ये काटा लढत
जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायती बिनविरोध
जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतीसाठी विक्रमी साडेतीन हजार अर्ज
ग्रामपंचायतीची जागा एक अन् अर्ज आले 203

या पॅनेलतर्फे वाडॅ नं 1 मध्ये सत्तार मौला मुजावर व शितलकुमार आप्पासाो कोथळे हे रिंगणात आहेत. वॉड नं. दोन मध्ये हेमलता अरविंद वाले, आण्णासाहेब नेमगोंडा पाचोरे व विलासमती श्र्रीकांत पाटील हे उमेदवार रिंगणात आहेत. वॉर्ड नंबर 3 मध्ये दिलीप बाळासाहेब मदने, सुवर्णजित बाबासो काकडे व रंजना मिलिंद कांबळे हे रिंगणात आहेत. वॉर्ड नंबर 4 मध्ये दिपाली रमेश साळुंखे, अमितकुमार महावीर पाटील व शालन सुभाष पाचोरे हे निवडणूक रिंगणात आहेत.

वॉर्ड नंबर 5 मध्ये पल्लवी श्र्रीकांत ठाले, दादासो पासगोंडा पाटील व शफिया गुलाब मुल्ला हे निवडणूक रिंगणात आहेत. वॉर्ड नंबर सहा मध्ये जगन्नाथ कृष्णा ठाले, मयुरी बिपीन चौगुले व समिना सरदार मुल्ला हे निवडणूक रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात सत्ताधारी ग्रामविकास पॅनेलने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज