rajkiyalive

SANGLI BANK : जिल्हा बँकेच्या 48 अधिकार्‍यांकडून शाखांची चौकशी

अहवालानंतर कारवाई होणार

जनप्रवास । प्रतिनिधी
SANGLI BANK : जिल्हा बँकेच्या 48 अधिकार्‍यांकडून शाखांची चौकशी : सांगली ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील जिल्ह्यातील सर्वच शाखात अशाप्रकारे अपहार झाला आहे का? याबाबतची तपासणी करण्यासाठी सहा पथके तयार करण्यात आली आहेत. अधिकारी आणि कर्मचारी अशा 48 जणांकडून गुुरुवारपासून जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये चौकशी सुरू करण्यात आली आहे. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

SANGLI BANK : जिल्हा बँकेच्या 48 अधिकार्‍यांकडून शाखांची चौकशी

जिल्हा बँकेतील शेतकर्‍यांच्या खात्यावर शासनाकडून विविध प्रकारचे अनुदान, विमा रक्कम देण्यात येते. ही रक्कम शेतकर्‍यांच्या पाठवली जाते. यातील अनेक खात्यावरील रक्कम काढली जात नाही. अनेक वर्षापासून कोट्यावधी रुपयाची रक्कम तशीच पडून आहे. या रकमेचा अपहार करून ती काढण्यात आल्याचा प्रकार तासगाव मार्केट यार्ड शाखेत पुढे आला. त्याशिवाय त्यानंतर निमणी सिद्धेवाडी येथेही असे प्रकार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संचालक मंडळाची तातडीची बैठक घेण्यात आली.

तीन कर्मचार्‍यांचे निलंबन करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला

त्याशिवाय अशा पद्धतीने अपहार इतरत्र झाला आहे का याची तपासणी करण्यासाठी 48 अधिकारी, कर्मचारी यांची सहा पथके तयार करण्यात आली. ही पथके गुरुवारपासून चार दिवस विविध शाखात भेटी देऊन तपासणी करणार आहेत. तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. गुरुवारी सार्वजनिक सुट्टीचा दिवस असूनही जिल्हा बँकेचे अधिकारी कर्मचारी हे कामावर हजर होते. त्यांनी अनुदान आलेल्या खात्याची तपासणी सुरू केली आहे. पुढील चार दिवस ही तपासणी सुरू राहणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ हे बुधवारपासून बँकेच्या विविध शाखाना भेटीत देत आहेत.

केंद्र सरकारने गुरुवारी बौद्ध पौर्णिमेची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती . त्याप्रमाणे सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. मात्र जिल्हा बँकेचे अधिकारी, कर्मचारी हे अपहार प्रकरणाची तपासणी करण्यासाठी कामावर हजर होते. जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ हे बुधवारपासून बँकेच्या विविध शाखाना भेटीत देत आहेत. बुधवारी त्यांनी कवलापूर, तासगाव, कवठेएकंद येथील शाखेला भेट दिली. त्याशिवाय गुरुवारी त्यांनी जत, कुंभारी येथील शाखांना भेट देऊन पाहणी केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज