rajkiyalive

SANGLI BANK NEWS : दुष्काळ निधी अपहार प्रकरणी 13 जणांवर फौजदारी,  जिल्हा बँकेकडून तासगाव, जत, आटपाडीमध्ये गुन्हे दाखल

सांगली

SANGLI BANK NEWS : दुष्काळ निधी अपहार प्रकरणी 13 जणांवर फौजदारी,  जिल्हा बँकेकडून तासगाव, जत, आटपाडीमध्ये गुन्हे दाखल : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखांमध्ये पडून राहिलेल्या दुष्काळ निधीच्या एक कोटी 20 लाख रुपयांच्या अपहर प्रकरणी 13 अधिकारी, कर्मचार्‍यांवर सोमवारी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. तासगाव तालुक्यातील 9, आटपाडी, जत आणि पलूस शहर कार्यालयातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. या तेरा कर्मचार्‍यांना यापूर्वी निलंबित करण्यात आले असून त्यांच्याकडून 90 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

SANGLI BANK NEWS : दुष्काळ निधी अपहार प्रकरणी 13 जणांवर फौजदारी,  जिल्हा बँकेकडून तासगाव, जत, आटपाडीमध्ये गुन्हे दाखल

SANGLI BANK NEWS : दुष्काळ निधी अपहार प्रकरणी 13 जणांवर फौजदारी,  जिल्हा बँकेकडून तासगाव, जत, आटपाडीमध्ये गुन्हे दाखल अपहारप्रकरणी दोषी असलेल्या प्रमोद कुंभार , योगेश वजरीनकर , मारुती हिले, संजय पाटील (सर्व तासगाव शाखा)अविनाश पाटील अविनाश सूर्यवंशी, सुरेश कोळी (सिद्धेवाडी शाखा)विजय यादव (निमणी शाखा )बाळासो सावंत (पोलीस शाखा) इंग्रजीत वाघमारे (बसरगी शाखा) मच्छिंद्र म्हारुगडे प्रदीप पवार, दिगंबर शिंदे(सर्व नेलकरंजी शाखा) यांचा समावेश आहे. तपास अधिकारी हबीब कुलकर्णी यांनी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.

जिल्हा बँकेतील शेतकर्यांच्या खात्यावर शासनाकडून विविध प्रकारचे अनुदान, विमा रक्कम देण्यात येते. यातील अनेक खात्यांवरील रक्कम काढली जात नाही. अनेक असलेल्या वर्षांपासून कोट्यवधी रुपयांची रक्कम तशीच पडून आहे. या रकमेचा अपहार करून ती काढल्याचा प्रकार तासगाव मार्केट यार्ड शाखेत पुढे आला.

त्यानंतर सिद्धेवाडी येथेही असे प्रकार झाल्याचे निष्पन्न झाले. त्याशिवाय निमणी, हातनूर येथील शाखेतही असे प्रकार आढळल्यानंतर संबंधित कर्मचार्यांना तत्काळ निलंबित केले. तपासणीमध्ये एक कोटी वीस लाख रुपयांचा आभार निश्चित झाला असून त्यापैकी 90 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत काही कर्मचारी संचालकाच्या जवळचे आहेत. अपहाराचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर ते दडपण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी या संबंधित संचालकाचा दबाव जुगारत कठोर कारवाई करण्याची भूमिका घेतली.

त्यानुसार अगोदर निलंबन करून आता फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दाखल केला. जिल्हा बँकेतर्फे चांगले काम करणार्यांना प्रोत्साहन तर चुकीचे काम करणार्यांवर कारवाई केली जाते. बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एकावेळी सर्वाधिक 13 कर्मचार्यांवर कारवाई केली आहे,

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज