rajkiyalive

sangli crime : सांगलीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला : तिघांवर गुन्हा दाखल.

सांगली :

sangli crime : सांगलीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला : तिघांवर गुन्हा दाखल. : शहरातील झुलेलाल चौक ते 100 फुटी रोडकडे जाणार्‍या रस्त्यावरून चालत निघालेल्या तरुणास रस्त्यात अडवून पूर्ववैमनस्यातून तिघांनी बेदम मारहाण करत हत्याराने वार करत गंभीर जखमी केले. सदरची घटना हि शुक्रवार दि. 27 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी जखमी सौरभ अशोक यादव (वय 20 रा. शामरावनगर) याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणार्‍या अजय आष्टेकर, अभि पवार आणि एक अनोळखी (सर्व रा. सांगली) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

sangli crime : सांगलीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला : तिघांवर गुन्हा दाखल.

याबाबत अधिक माहिती अशी कि, जखमी सौरभ यादव हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील शामरावनगर परिसरात असणार्‍या गजानन कॉलनी मध्ये राहतो. शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास यादव हा बस स्थानक जवळ असणार्‍या झुलेलाल चौक ते 100 फुटी रोडकडे जाणार्‍या रस्त्यावरून चालत निघाला होता. यावेळी संशयित तिघेजण दुचाकीवरून आले. रस्त्यात सौरभ याला अडवून जुन्या वादाच्या रागातून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरवात केली.

यावेळी संशयित अजय आष्टेकर याने त्याच्या जवळ असलेल्या लोखंडी हत्याराने डोक्यात मारून जखमी केले. संशयित अभि पवार याने त्याच्या जवळ असलेल्या हत्याराने हातावर वार करत गंभीर जखमी केले. अनोळखी व्यक्तीने विटाने आणि दगडाने मारहाण केली. यामध्ये सौरभ हा गंभीर जखमी झाला. मारहाणीनंतर चौघांनी तेथून पळ काढला. घडलेल्या या घटनेनंतर जखमी सौरभ याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणार्‍या संशयित तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज