सांगली :
SANGLI CRIME : सेल्फीच्या नादात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह 48 तासाने सापडला : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरटी पत्रात मृतदेह. : शहरातील कृष्णा नदीवरील बंधार्यावर सांगलीवाडीकडील बाजूला सेल्फी घेताना तोल गेल्याने तीन दिवसापूर्वी मोईन मोमीन (वय 24, हनुमाननगर) हा तरुण वाहून गेला होता. त्याच्या शोधासाठी गेल्या दोन दिवसांपासून काही रेस्क्यू टीम प्रयत्न करत होत्या. अखेर मंगळवारी (आज) सकाळी पुन्हा मोहीम राबवण्यात आली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरटी येथील नदीपत्रात मोमीन याचा मृतदेह मिळाला. यानंतर तब्बल 48 तासांचे सुरु असणारे रेस्क्यू ऑपरेशन थांबले. स्पेशल रेस्क्यू फोर्स, आयुष हेल्पलाईन टीम आणि मनपा अग्निशमन पथकाचा या शोध मोहिमेत सहभाग होता. दरम्यान, कुटुंबियांना याची माहिती मिळताच नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला होता.
SANGLI CRIME : सेल्फीच्या नादात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह 48 तासाने सापडला : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरटी पत्रात मृतदेह.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोईन हा बॉक्सिंगचा प्रशिक्षक होता. सांगलीतील एका मुलीसोबत तीन दिवसापूर्वी कृष्णा नदीकाठावर आला होता. सांगलीवाडीच्या बाजूने तो चालत नदीवरील बंधार्यावर आला. तेथेच तो सेल्फी घेत होता. मोबाईलवर सेल्फी घेताना मोईन नदी पात्रात पडला. याबाबत सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी आले. स्पेशल रेस्क्यू फोर्स, आयुष हेल्पलाईन टीमने बोटीतून शोध घेतला.
ALSO READ
SANGLI CRIME : सांगलीत सेल्फीच्या नादात तरुण गेला वाहून
मात्र, मिळून आला नाही. कल सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली. म्हैसाळ बंधारा, हरिपूर येथून पुन्हा बंधार्याजवळ शोध घेण्यात आला. पाण्याचा प्रवाह वाढल्याने शोध मोहीमेत अडथळा निर्माण होत होता. आज सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरटी येथील नदीपत्रात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पथकाला मिळाली. तातडीने पथक घटनास्थळी दाखल झाले मृतदेह पाहण्याबाहेर काढला त्यावेळी हा मृतदेह मोईन याचा असल्याचे स्पष्ट झाले.
48 तासानंतर वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यात आढळून आला. मोहीमेत अमीर नदाफ, कैलास वडर, महेश गव्हाणे, योगेश आवटे, गणेश आवटी, मोहसीन शेख, योगेश मदने, सुरज शेख, रुद्र कारंडे, अविनाश पवार सहभागी होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



