rajkiyalive

SANGLI CRIME : कवलापूरात पूर्ववैमनस्यातून तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष भानुदास पाटील यांच्यावर कोयत्याने हल्ला

सांगली :

SANGLI CRIME : कवलापूरात पूर्ववैमनस्यातून तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष भानुदास पाटील यांच्यावर कोयत्याने हल्ला : कवलापूर येथील तंटामुक्ती अध्यक्ष भानूदास किसनराव पाटील (वय 42 रा. कवलापूर) यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. डोक्यावर आणि हातावर वार झाले असून वार झाले असून सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. कवलापूरमधील सिद्धेश्वर मंदिराजवळ आज रात्री साडेसात ते आठच्या सुमारास ही घटना घडली. पुर्वीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान, ग्रामीण पोलिसांच्या पथकाने एका संशयित हल्लेखोरास ताब्यात घेतल्याचे समजते आहे. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

SANGLI CRIME : कवलापूरात पूर्ववैमनस्यातून तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष भानुदास पाटील यांच्यावर कोयत्याने हल्ला

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भानूदास पाटील हे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. माजी ग्रामपंचायत सदस्यही होते. सध्या ते सत्ताधारी गटाचे नेते आहेत. आज रात्री साडेसातच्या सुमारास गावातील सिद्धेश्वर मंदिराजवळ ते गेले होते.

त्यावेळी संशयित त्याठिकाणी आले. पुर्वी झालेल्या वाद पुन्हा उफाळून आले. बाचाबाची झाल्यानंतर संशयिताने कोयत्याने हल्ला चढवला. त्यानंतर संशयित पसार झाले. दरम्यान, जखमी पाटील यांना तातडीने उपचारासाठी सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले.

त्यानंतर ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेश रामाघरे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तातडीने एका संशयितास ताब्यात घेतले आहे. हा हल्ला पुर्वीच्या वादातून झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज