rajkiyalive

sangli crime : मोटारसायकल चोरणार्‍या चार चोरट्यांना केले जेरबंद

सांगली :

sangli crime : मोटारसायकल चोरणार्‍या चार चोरट्यांना केले जेरबंद  : विश्रामबाग आणि संजयनगर मधील पार्किंग मध्ये लावलेल्या मोटारसायकल चोरणार्‍या चार चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले. चौघांकडून चोरीतील दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत. विश्रामबाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई केली.

sangli crime : मोटारसायकल चोरणार्‍या चार चोरट्यांना केले जेरबंद

इम्रान अल्लाबक्ष शेख (वय 35 रा. मांजरी ता. चिक्कोडी जि. बेळगाव). सरफराज शाहनवाज शेख (रा. डी मार्ट जवळ, सांगली), सागर धनाजी लोखंडे (वय 34 रा. संपत चौक, माधवनगर) आणि राज दर्‍याप्पा यादव (वय 24 रा. चिंतामणीनगर झोपडपट्टी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, विश्रामबाग परिसरातील दगडे हायस्कुल जवळ राहणार्‍या सुहास मदिहळ्ळी यांची मोटारसायकल चोरीला गेली होती. याबाबत त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मोटारसायकल चोरीचा तपास गुन्हे प्रकटीकरण शेखेचे पथक करत असताना पथकातील कर्मचार्‍यांना माहिती मिळाली कि, चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी दोघेजण शहरातील काळी खण जवळ असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ थांबले आहेत.

त्यानुसार पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी सापळा लावला असता संशयित शेख हे त्याठिकाणी उभे असलेले दिसले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळ असलेल्या मोटारसायकल बाबत कसून चौकशी केली असता सदरची मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. यावेळी संशयित सरफराज शेख हा त्याठिकाणाहून पळून गेला होता.

त्यालाही पकडून अटक करण्यात आली. दुसरीकडे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक शहरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील सोमनाथ पतंगे आणि अजय बेंदरे यांना संशयित सागर लोखंडे हा चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी अहिल्यादेवी होळकर चौक येथे आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी जाऊन लोखंडे आणि यादव यांना ताब्यात घेतले.

यावेळी त्यांच्याकडील दुचाकीबाबत कडून चौकशी केली असता त्यांनी शांतिनिकेतनच्या कॉलेज परिसरातून सदरची मोपेड दुचाकी चोरल्याचे सांगितले. यावेळी त्याच्याकडून सदरची दुचाकी जप्त करत त्याला संजयनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, ईश्वर ओमासे यांच्या पथकाने केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज