sangli crime news : महिला गृह उद्योगाच्या नावे 35 महिलांची 86 लाख 28 हजारांची फसवणूक : गुरुकृपा महिला गृह उद्योगाच्या दोघांवर गुन्हा दाखल.सांगली : सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांकडून चटणी पॅकिंगच्या नावाखाली गृह उदयोग देण्यासाठी अनामत रक्कम म्हणून प्रत्येकी दहा ते 15 हजार रुपये घेऊन सुरवातीला चटणी पॅकिंग करण्यासाठी देऊन नंतर ती बंद करून सुमारे 35 महिलांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चंद्रकांत महादेव कडोले (वय 59 रा. सांगली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
sangli crime news : महिला गृह उद्योगाच्या नावे 35 महिलांची 86 लाख 28 हजारांची फसवणूक : गुरुकृपा महिला गृह उद्योगाच्या दोघांवर गुन्हा दाखल.
त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुरुकृपा महिला गृह उद्योग चालविणार्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मण दुर्गाप्पा बंडगर (रा. मूळ धाराशिव, सध्या सांगली) आणि सौ. कविता राजकुमार शिंदे (कविता लक्ष्मण बंडगर रा. सोन्याळ ता. जत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सदर फसवणुकीची घटना हि दि. 03 जानेवारी 2023 ते दि. 14 जुलै 2024 या कालावधीत घडली.
याबाबत चंद्रकांत कडोले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे कि, संशयित लक्ष्मण बंडगर यांनी गुरुकृपा महिला गृह उद्योग नावाने उद्योग सुरु केला. कडोले आणि त्यांच्या पत्निसह इतर ओळखीच्या 24 महिलांनी प्रत्येकी दहा ते पंधरा हजार रुपये घेऊन तसेच सांगली, मिरज, पलूस, तासगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांकडून एक हजार ते 1 हजार 800 रुपये अनामत रक्कम घेऊन सभासद तयार करून त्यांना गुरुकृपा महिला गृह उद्योगाचे सभासद केले.
महिलांकडून संशयित दोघांनी दहा हजार रुपये अनामत रक्कम घेऊन काही दिवस अनामत रक्कम जमा करणार्या महिलांना चटणी पॅकिंग करिता देऊन नंतर हळूहळू चटणी पॅकिंगला देण्याचे बंद केले. याबाबत महिलांनी विचारणा केली असता समाधानकारक उतार येत नव्हते. तसेच अनामत रक्कम देखील परत मिळत नव्हती. गृह उद्योग देण्याच्या नावाखाली 86 लाख 28 हजार 500 रुपये घेऊन फसवणूक केल्याचे कडोले यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक केल्या प्रकरणी संशयित दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.