rajkiyalive

SANGLI CRIME : मावा खायला दिला नाही म्हणून मौजे डिग्रजमध्ये तरुणास मारहाण

 

सांगली : SANGLI CRIME : मावा खायला दिला नाही म्हणून मौजे डिग्रजमध्ये तरुणास मारहाण मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज मध्ये मावा खायला दिला नाही म्हणून चौघांनी मिळून एका रिक्षा चालकास लाथाबुक्क्यांसह फायटरने मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली. सदरचा मारहाणीची घटना हि गुरुवार दि. 13 जून रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

SANGLI CRIME : मावा खायला दिला नाही म्हणून मौजे डिग्रजमध्ये तरुणास मारहाण

या प्रकरणी जखमी अमोल दयानंद कांबळे (वय 39 रा. नवीन वसाहत, मौजेडिग्रज) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणार्‍या उमेश नागेश कांबळे (वय 35), सोमनाथ काकासो कांबळे (वय 30), आदित्य संजय ढेरे (वय 26) आणि आशिष राजाराम साळुंखे (वय 32 सर्व रा. मौजे डिग्रज) या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, जखमी अमोल कांबळे हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथे राहतात. त्यांचा रिक्षाचा व्यवसाय आहे. गुरुवार दि. 13 जून रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कांबळे हे गावातील कोळी समाज मंदिर जवळ त्यांच्या रिक्षात बसले होते. यावेळी संशयित उमेश कांबळे हा त्याठिकाणी आला. त्याने अमोल यांना मावा खायला मागितला.

संशयित सोमनाथ कांबळे याने त्याच्या जवळ असलेल्या फायटर ने कंबरेजवळ मारले.

यावेळी त्यांनी माझ्याजवळ मावा नाही असे सांगितले. यावेळी रागातून उमेश कांबळे याने हात धरून लाथ मारली. संशयित सोमनाथ कांबळे याने त्याच्या जवळ असलेल्या फायटर ने कंबरेजवळ मारले. संशयित आदित्य ढेरे आणि आशिष साळुंखे यांनी सळई आणि हाताने मारहाण करून जखमी केले. घडलेल्या या घटनेनंतर जखमी अमोल कांबळे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणार्‍या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज