rajkiyalive

SANGLI LOKSABHA : भाजपच्या पराभवासाठी सांगलीचा हट्ट सोडा

जनप्रवास । सांगली
SANGLI LOKSABHA : भाजपच्या पराभवासाठी सांगलीचा हट्ट सोडा : सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला चांगले वातावरण असताना शिवसेनेने या जागेसाठी हट्ट धरला आहे, तर दुसरीकडे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देखील जाहीर करून टाकली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये चिंता वाढली आणि काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी थेट मातोश्री गाठत उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. भाजपचा पराभव करायचा असेल तर सांगलीचा हट्ट सोडावा, जागा ही कॉँग्रेसलाच द्यावी, अशी मागणी थोरात यांनी केली.

SANGLI LOKSABHA : भाजपच्या पराभवासाठी सांगलीचा हट्ट सोडा

बाळासाहेब थोरातांनी घेतली उध्दव ठाकरेंची भेट

काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्या यात्रेत उद्धव ठाकरे यांनी सहभागी व्हावे, याबाबतचे निमंत्रण देण्यासाठी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात मातोश्री निवासस्थानी गेले होते. सांगली लोकसभा मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील इच्छूक आहेत. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला जात आहे. तर उध्दव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना दिल्लीत पाठवा, असे जाहीर विधान केले होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी सांगली लोकसभेच्या मतदारसंघाबाबत आपली भूमीका मांडली.

 सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला चांगले वातावरण आहे.

भाजप विरोधी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी एकत्रित मोठ बांधली आहे. पक्षाने केलेल्या सर्वेमध्ये काँग्रेसला विजयाची पूर्ण संधी आहे. या परिस्थितीमध्ये पक्ष किंवा उमेदवार बदलला तर भाजपची एक जागा कमी करण्याची संधी विकास महाआघाडीच्या हातातून जाईल. त्यामुळे सांगलीचा हट्ट सोडावा, भाजपचा पराभव करण्याचे ध्येय ठेवून काँग्रेसला ही जागा द्यावी, अशी मागणी थोरात यांनी केली.

कोल्हापूर हा शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ आहे. तरी देखील हा मतदारसंघ आम्ही काँग्रेसला दिला आहे.

यावर उध्दव ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले. कोल्हापूर हा शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ आहे. तरी देखील हा मतदारसंघ आम्ही काँग्रेसला दिला आहे. काँग्रेसने देखील आमचा विचार करावा, सांगली त्यांनी सोडावा, असा पुनरूच्चार त्यांनी केला. मात्र थोरात यांनी ‘विजय’ हा निकष ठेवावा, अशी मागणी कायम ठेवली. थोरात यांनी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना याबाबतची माहिती दिली. सांगली मतदार संघ आपण काही केल्या सोडणार नाही. विशाल पाटील हेच लढतील. चिंता करू नका, अशी पुन्हा एकदा खात्री त्यांनी बाळासाहेब थोरात यांनी पृथ्वीराज पाटील यांना दिली.

सांगलीचा निर्णय नाही: विजय वडेट्टीवार

राज्यातील जागा लढविण्याबाबत अंतिम निर्णय अद्याप महाविकास आघाडीने घेतलेला नाही. सांगली लोकसभा मतदारसंघाचा देखील कोणताही निर्णय झालेला नाही. शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी एखाद्याला दिल्लीला पाठवू, असे म्हटले म्हणजे त्यांना उमेदवारी जाहीर झाली असा अर्थ निघत नाही. सांगली मतदार संघ काँग्रेस लढणार आहे. कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडणार नाही. पुढच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत योग्य तो निर्णय होईल, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज