rajkiyalive

SANGLI LOKSABHA : लोकसभा घेतली आता विधानसभेला उध्दव ठाकरे सेनेची आदळआपट

SANGLI LOKSABHA : लोकसभा घेतली आता विधानसभेला उध्दव ठाकरे सेनेची आदळआपट : सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत काँग्रेस व शिवसेना (उबाठा) गटाचा जोरदार वाद झाला होता. शिवसेनेची कोल्हापुरची असलेली जागा काँग्रेसला शाहू महाराजांसाठी देण्यात आली, त्यामुळे सांगली लोकसभेची काँग्रेसची जागा परस्पर उबाठाने घेतली. आणि या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे दोन आमदार, एक राष्ट्रवादीचे आमदार होते.

SANGLI LOKSABHA : लोकसभा घेतली आता विधानसभेला उध्दव ठाकरे सेनेची आदळआपट

जनप्रवास । सांगली
SANGLI LOKSABHA : लोकसभा घेतली आता विधानसभेला उध्दव ठाकरे सेनेची आदळआपट : सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत काँग्रेस व शिवसेना (उबाठा) गटाचा रंगलेला वाद निवडणूक संपली तरी कायम आहे. उबाठा गटाकडून सतत काँग्रेस व आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला टार्गेट केले जात आहे. स्थानिक पदाधिकारी आता विधानसभेचे इशारे देत आदळआपट करत आहेत. मात्र उबाठाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विधानसभेला काँग्रेसच्या आड येणार नसल्याचे जाहीर सभेत स्पष्ट सांगितले होते. आता विधानसभेला हाच प्रकार सुरू असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते संतप्त होत आहे.

सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत काँग्रेस व शिवसेना (उबाठा) गटाचा जोरदार वाद झाला होता. सांगली लोकसभेची काँग्रेसची जागा परस्पर उबाठाने घेतली. आणि या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे दोन आमदार, एक राष्ट्रवादीचे आमदार होते.

शिवसेनेचे वर्चस्व नसताना देखील ही जागा दिली जात असल्याने आ. विश्वजीत कदम आक्रमक झाले होते.

शिवाय अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचे वर्चस्व होते. शिवसेनेचे वर्चस्व नसताना देखील ही जागा दिली जात असल्याने आ. विश्वजीत कदम आक्रमक झाले होते. त्यांनी देखील शेवटपर्यंत जागा राखण्यासाठी प्रयत्न केले, पण शिवसेनेने हट्ट सोडला नाही. अखेर विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची त्यांना साथ मिळाली. त्यामुळे शिवसेनेचा पारा चढला. निवडणूक संपताच उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटावर महाविकास आघाडी धर्म पाळला नसल्याचा आरोप केला.

पुणे येथे एक खासगी कार्यक्रमात आ. विश्वजीत कदम यांनी मी कोणत्या पाटलांच्या मागे उभा होतो, हे चार जूनला कळेल, असे विधान केले होते.

त्यानंतर काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासााठी आ. विश्वजीत कदम, विशाल पाटील, आ. विक्रम सावंत व जयश्रीताई पाटील यांना प्रमुख निमंत्रित करण्यात आले होते. या मेळाव्याला आ. विश्वजीत कदम व विशाल पाटील यांनी आवर्जून उपस्थिती दाखवून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. बंडखोर विशाल पाटील यांना मेळाव्यासाठी का निमंत्रित केले? असा सवाल करत पुन्हा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला.

SANGLI LOKSABHA : लोकसभा घेतली आता विधानसभेला उध्दव ठाकरे सेनेची आदळआपट :  पृथ्वीराज पाटील व विशाल पाटील यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी देखील ते करत आहेत.

शिवाय आ. जयंत पाटील यांच्यावर देखील ते आरोप करत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील अनेक कार्यकर्ते भाजप व विशाल पाटील यांच्या प्रचारात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. पण जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी शिवसेना (उबाठा) गटाची किती ताकद चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी उभी केली? सांगलीत पक्षाची ताकद कमी होती. भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अडचण निर्माण करण्याची दाट शक्यता होती. ही बाब शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना सांगून सांगलीच्या बदल्यात दुसरी जागा का घेतली नाही? असे सवाल देखील आता काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते शिवसेनेला करू लागले आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी होईल,

शिवसेना उबाठा गट विधानसभेला ताकद दाखवेल, असे इशारा काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला दिला आहे. वास्तविक लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी उबाठा गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सांगलीत आले होते. त्यावेळी त्यांनी आ. विश्वजीत कदम यांच्यासाठी लोकसभेची जागा सोडली असती पण आता विधानसभेला आम्ही आड येणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. याचा विसर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना पडलेला दिसत आहे. महाविकास आघाडीत एकजूट दाखवायची वेळ आली असताना काँग्रेस व शिवसेना (उबाठा) गटाचा वाद काही थांबताना दिसत नाही. याचा परिणाम भविष्यातील निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.

शिवसेना पदाधिकारी किती देणार मताधिक्य?

काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेते व काही कार्यकर्त्यांनी आघाडीचे काम केले नाही. उबाठा गटाचे चंद्रहार पाटील यांचा प्रचार केला नाही, असा आरोप शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांकडून केला जात आहे. मात्र या पदाधिकार्‍यांच्या गावात, जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना किती मताधिक्य मिळते? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

SANGLI LOKSABHA : लोकसभा घेतली आता विधानसभेला उध्दव ठाकरे सेनेची आदळआपट : चंद्रहार पाटलांचा बळी कोणामुळे?

महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा राजकीय बळी महाविकास आघाडीच्या नेत्यामुळे गेला असल्याचा आरोप खा. संजयकाका पाटील यांनी आ. विश्वजीत कदम यांचे नाव न घेता केला होता. तर दुसरीकडे विशाल पाटील यांनी खासदार संजयकाका पाटील व त्यांच्या दिलदार शत्रूनेच सांगलीची नुरा कुस्ती करण्याचा प्रयत्न करून शेतकरी मुलाचा बळी दिला असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे चंद्रहार पाटील यांचा राजकीय बळी नेमका कोणामुळे गेला? हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज