rajkiyalive

SANGLI LOKSABHA : नाना पटोलेंचा फोन अन् जगतापांचा सावध पवित्रा

जनप्रवास । जत
SANGLI LOKSABHA : नाना पटोलेंचा फोन अन् जगतापांचा सावध पवित्रा :प्रारंभापासूनच संजय पाटील यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध करणारे माजी आ. विलासराव जगताप यांच्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केल्याने जिल्ह्यातील राजकारणात खळबळ माजली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांचा संपर्कच जगतापांनी टाळल्याने भाजपातंर्गत जिल्ह्यातील खा. संजय पाटील विरोधक आता कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय निरिक्षकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

SANGLI LOKSABHA : नाना पटोलेंचा फोन अन् जगतापांचा सावध पवित्रा

संजय राऊत यांच्याकडूनही संपर्क साधण्याचा प्रयत्न

शिवसेना ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्याने विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे. जिल्ह्यातील काँग्रेसची नेतेमंडळी तातडीने दिल्लीला रवाना झालेली असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भाजपातंर्गत संजय पाटील विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न तर नाही ना? असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन आल्यानंतर माजी आ. विलासराव जगताप यांनी मात्र सावध भूमिका घेतलेली आहे. अद्याप सांगली लोकसभा मतदारसंघातील राजकारणाची दिशा स्पष्ट झालेली नसल्यानेच विलासराव जगताप यांनी सावध भूमिका घेतलेली आहे. विलासराव जगताप यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. मात्र खा. संजय पाटील यांच्या उमेदवारीला माजी आमदार विलासराव जगताप यांनी विरोध केला असून त्यांचा प्रचार करणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी वरून धुमशान सुरू असून. शिवसेनेने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

मात्र विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर काँग्रेस ठाम असून .सांगलीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्या पार्श्वभूमीवरच काँग्रेस नेते जिल्ह्यातील नाराज भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांच्याशी संपर्क साधाला व विशाल पाटील यांचा प्रचार करण्याची विनंती केली असल्याची चर्चा आहे, मात्र विलासराव जगताप यांनी पहिला आपल्या उमेदवारी चा तिढा सोडवा त्यानंतर काय करायचे याचा निर्णय कार्यकर्त्याशी चर्चा करून घेऊ अशी भूमिका मांडली असल्याचे समजते.

संजय राऊत यांनी चंद्रहार पाटलांसाठी मोर्चेबांधणीकरिता माजी आमदार विलासराव जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. जतला जाऊन संजय पाटील यांच्याविरोधात जगतापांचा रोष इनकॅश करत चंद्रहार पाटलांना मदत होईल अशी त्यांची धारणा होती, मात्र विलासराव जगताप यांच्याशी त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे अप्रत्यक्ष जगताप यांनी राऊत यांना टाळल्याचीच चर्चा होती. परिणामी राऊत यांना जत दौरा रद्द करण्याची नामुष्की आली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज