rajkiyalive

SANGLI MAHAPALIKA : अजितदादा गटाने महापालिका क्षेत्रात पाय पसरले…

SANGLI MAHAPALIKA : अजितदादा गटाने महापालिका क्षेत्रात पाय पसरले...

 

SANGLI MAHAPALIKA : अजितदादा गटाने महापालिका क्षेत्रात पाय पसरले…

 

SANGLI MAHAPALIKA : अजितदादा गटाने महापालिका क्षेत्रात पाय पसरले… ताकद वाढली: राज्यातील संघर्ष मनपापर्यंत पोहचला

 

 

जनप्रवास । प्रतिनिधी

सांगली: महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांची ताकद मोठी होती. मात्र त्यांना शह देण्याचे काम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले आहे. दोन माजी महापौर, नगरसेवकांना पक्षात घेऊन अजितदादांनी पक्षाचा विस्तार करण्यास सुरूवात केली, आणि शरद पवार यांच्या गटाची राष्ट्रवादी खिळखिळी केली. अजितदादा पवार गटाने महापालिका क्षेत्रात चांगलेच पाय पसरले आहेत. त्यामुळे आ. जयंत पाटील यांच्या भूमीकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात अजितदादा गटाने आमदार जास्त आहेत.

सहा महिन्यांपूर्वी अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीत भूकंप घडवत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. या पठिंब्यावर अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाले तर त्यांच्या समर्थक काही आमदारांना मंत्रीपदे मिळाली. सध्या राज्यात अजितदादा गटाने आमदार जास्त आहेत. त्यावेळीपासून राज्यात शरद पवार विरूध्द अजितदादा पवार यांच्यात संघर्ष सुरू आहे. दोन्ही नेत्यांनी आपले गट वाढविण्यासाठी राज्यभर दौरे सुरू केले, मेळावे झाले, बैठका सुरू आहेत. हा राज्यातील हा संघर्ष महापालिका क्षेत्रापर्यंत पोहचला. सांगली, मिरज व कुपवाड शहरात देखील अजितदादा पवार यांनी अनेकांवर गळ टाकला.

 

पहिल्या टप्प्यात माजी माजी महापौर इद्रिस नायकवडी, दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक पद्माकर जगदाळे हे गळाला लागले.

नुकत्याच झालेल्या निवडीत अजितदादा पवार यांनी इद्रिस नायकवडी यांना राष्ट्रवादी प्रदेश अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. तर पद्माकर जगदाळे यांच्यावर शहर जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यानंतर या पदाधिकार्‍यांनी महापालिका क्षेत्रात अजितदादा गट वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आ. जयंत पाटील यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी सांगलीत दोन बैठका देखील घेतल्या. पक्षातील आऊटगोईंग रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, अनेकजण थांबले देखील मात्र गुप्तपणे अजितदादांच्या संपर्कात कायम राहिले.

अजितदादा पवार यांनी अनेक माजी नगरसेवकांबरोबर दूरध्वनीवरून देखील चर्चा केली.

अखेर माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी नगरसेवक विष्णू माने यांच्यासह काही जणांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी (अजितदादा गट) बरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. अजितदादा पवार यांनी अनेक माजी नगरसेवकांबरोबर दूरध्वनीवरून देखील चर्चा केली. दोन ते तीन माजी नगरसेवक वगळता इतरांनी अजितदादांबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आ. जयंत पाटील राज्यात जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र सांगली महापालिका हक्काच्या ठिकाणी त्यांचे समर्थक अजितदादा गटात दाखल झाल्याने आ. पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.

 

महापालिकेच्या निवडणुका किमान वर्षभर लांबणीवर पडल्या आहेत.

मात्र त्यापूर्वी अजितदादा गटाची जोरदार पेरणी महापालिका क्षेत्रात झाली आहे. भविष्यात काही माजी पदाधिकारी देखील अजितदादा गटात दाखल होणार आहेत. त्यांची चर्चा देखील सुरू आहे. त्यामुळे अजितदादांची राष्ट्रवादी चांगलीच महापालिका क्षेत्रात पाय पसरत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा
JAYANT PATIL : आ. जयंत पाटील समर्थकांचा मोठा गट अजितदादांच्या गळाला : मनपा क्षेत्रात खळबळ
सामना भाजप-काँग्रेसचा, लक्ष्य जयंतरावांच्या भूमिकेकडे
जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार
खुजगावचे धरण आज असते तर…..राजारामबापुंची आठवण
जयंत पाटलांना घेरण्यासाठी महाडिकांची तयारी
राज्यात चर्चा केवळ जयंत पाटलांचीच…
वारसा असूनही… न झालेले आमदार...

प्रत्येक निवडणुकीत सुरेश आवटींचा पक्ष वेगळाच…

महापालिकेच्या निवडणुकीत मिरज पॅटर्नची चर्चा जोरात होत असते. त्यामध्ये मिरजेतील काही नेते कायम चर्चेत राहत असतात. गुरूवारी स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश आवटी यांनी अजितदादा पवार यांची भेट घेतली. त्यामुळे ते राष्ट्रवादीत (अजितदादा गट) येणार हे फिक्स झाले आहे. 1998 ला ते काँग्रेस समर्थक होते. 2003 ला ते राष्ट्रवादीचे झाले. 2008 ला त्यांनी विकास महाआघाडीत प्रवेश केला. तर 2013 पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले. तर 2018 आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रत्येक महापालिकेच्या निवडणुकीत त्यांचा पक्ष वेगळाच आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज