rajkiyalive

sangli political news : मंत्रीपदाच्या शर्यतीत सांगलीचे चौघे खाडे, गाडगीळ, पडळकर, बाबर यांची नावे

 sangli political news : मंत्रीपदाच्या शर्यतीत सांगलीचे चौघे खाडे, गाडगीळ, पडळकर, बाबर यांची नावे : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविजय मिळवला. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबरोबर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यासाठी सांगली जिल्ह्यातून मंत्रीपदासाठी भाजपकडून पालकमंत्री सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर व शिवसेनेकडून सुहास बाबर यांची नावे चर्चेत आहेत.

sangli political news : मंत्रीपदाच्या शर्यतीत सांगलीचे चौघे खाडे, गाडगीळ, पडळकर, बाबर यांची नावे

विधानसभेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकारने जोरदार विजय मिळवला. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. आता नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विद्यमान विधानसभेची मुदत दि. 26 नोव्हेंबरपर्यंतच आहे. त्यापूर्वी नवे सरकार स्थापन करणे अपेक्षित आहे. त्यामुळे महायुती दोन दिवसात सरकार स्थापन करणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदासाठी शपथविधी होणार आहे. त्यामध्ये राज्यातील काही मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते. यात सांगली जिल्ह्यातील कोणाचा समावेश होणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

भाजप पक्षाकडून मिरज विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांना पुन्हा मंत्रीमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या शिवाय सांगली विधानसभेचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी हॅट्ट्रिक केली आहे. ते ‘आरएसएस’चे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार देखील होऊ शकतो. या बरोबर जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आ. गोपीचंद पडळकर यांचा देखील विचार पक्ष करू शकतो. त्यांची ओळख ओबीसी समाजाचे नेते म्हणून आहे. तर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला मताधिक्य मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत त्यांना मंत्री करण्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे त्यांच्याकडे देखील लक्ष लागले आहे.

शिवसेना पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुहास बाबर यांना राज्यमंत्री करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. स्व.अनिल बाबर यांना मंत्री करण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. मात्र मंत्रीमंडळ विस्तार लांबल्याने बाबर यांना मंत्रीपद मिळाले नाही. आता सुहास बाबर यांना राज्यमंत्री करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्द पाळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्ताराकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज