दिनेशकुमार ऐतवडे, सांगली
sangli political news : छोट्या पक्षांचे अस्तित्व संपले : गेल्या पाच वर्षात राज्याचे राजकारण भलतेच बदलले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आघाडीचे राजकारण राज्यात चालायचे परंतु यंदा तशी गरज भासली नाही. छोट्या पक्षांना सत्तेचे वेध लागले असतानाच आता त्यांना कुणीच विचारत नाही, अशी अवस्था झाली आहे.
sangli political news : छोट्या पक्षांचे अस्तित्व संपले
देशात एकेकाळी काँग्रेसचे राज्य होते. सुमारे साडेचारशे खासदार निवडून आणण्याचा विक्रम काँग्रेसने केला होता. तो विक्रम अजून तसाच असला तरी तो विक्रम आम्ही एक दिवस मोडू असा चंग मोदी आणि शहांनी बांधला. राज्यातील सर्वच पक्षांना आपल्या सोबत घेण्याचा जणू सपाटाच त्यांनी लावला. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद सर्व प्रकार त्यांनी अवलंबीले. याचा परिणाम असा झाला आहे की, सत्तेसाठी भाजपचे निमंत्रण यायच्या अगोदर त्यांच्या पक्तींला कोण अगोदर जाणार याची स्पर्धा लागली आणि शिवसेना, राष्ट्रवादी, रयत क्रांती संघटना, रामदास आठवलेंची आर. पी. आय. असे अनेक पक्ष त्यांच्या दावणीला बांधले गेले.
1995 मध्ये भाजपने राज्यात शिवसेना बरोबर युती करून पहिल्यांदा सत्ता भोगली.
स्व.बाळासाहेब ठाकरे आणि स्व. प्रमोद महाजन यांच्या पुढाकाराने ही युती तयार झाली होती. शिवसेना थोरला आणि भाजप धाकटा भाउ असेच सर्वत्र चर्चा असायची. शिवसेना भाजप या युतीमध्ये अनेक लहानसहान पक्षांचा समावेश होता. पुढे जावून आरपीआय आठवले गट, महादेव जानकर यांचा पक्ष, सदाभाउ खोत यांची रयत क्रांती संघटना, विनायक मेटे यांचा मराठा संघ असे अनेक लहान मोठे पक्ष भाजपच्या दावणी गेले आणि सत्तेत सामिल झाले. भाजपने या सर्वांचा शिडीसारखा उपयोग केला आणि पध्दतशीरपणे सर्वच पक्षाला संपवून टाकले.
शिवसेनेचे पानिपत
सर्वच लहान मोठ्या पक्षाचे उपयुक्त मूल्य त्यांनी घेतले आणि उपद्रव्य मूल्य कमी करून टाकले. सुरूवातीला या लहान पक्षांना त्यांची किंमत दाखवून दिल्यानंतर भाजपने मोठा बॉम्ब टाकला तो आपल्या सहकारी पक्ष असलेलेल्या शिवसेनेवर. जोपयंर्ंत बाळासाहेब ठाकरे जिवंत होते तो पर्यंत शिवसेनेकडे वाकड्या नजरेने कोणेही पाहू शकत नव्हते. भाजपही त्यांना बिलगूनच होता. परंतु त्यांच्या पश्चात भाजपने आपले रूप दाखवायला सुरूवात केली. त्यांनी अखंड शिवसेना पक्षच खावून टाकला. उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि एकनाथ शिंदे यांच्या रूपाने नवा गडी भाजपला मिळाला. शिवसेनेचा एक प्रकारचा धाक भाजपला होता. परंतु आता तो धाक उरला नाही. आता आपले अस्तित्व कसे टिकवायचे हाच प्रश्न शिवसेना उध्दव ठाकरे गटाला पडला आहे. एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेची डरकाळी घुमत होती. पण आता शिवसेनेचा वाघ झोपी गेला आहे.
दुसरीकडे भाजपबरोबर गेलेल्या एकनाथ शिंदेंची अवस्थाही काही वेगळी झाली. गेल्या टर्ममध्ये त्यांना मुख्यमंत्रीपद दिले परंतु सध्या त्यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे. त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद असले तरी त्यांच्यासोबतीला भाजपने अजित पवारांना बसविले आहे. त्यामुळे त्यांच्यावरही वॉच सुरू आहे.
राष्ट्रवादीत भूकंप
शिवसेना पाठोपाठ भाजपने राष्ट्रवादीवर घाला घातला. शरद पवारांना बाजूला टाकून भाजपने अजित पवार यांच्यावर डाव टाकला आणि राज्यात मोठा राजकीय भूकंप घडवून आणला. सध्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असे सत्तेत आहेत. काँगे्रस आणि शरद पवार राष्ट्रवादी गट विरोधी पक्षात आहेत. शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी पक्षावर गंडातर आल्याने आता काँग्रेस हाच एकमेव विरोधी पक्ष राहिला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रादेशिक पक्षावर वार करूनही अजून भाजपची भूक भागली नाही. शत प्रतिशत भाजप असाच नारा त्यांचा अजूनही आहे.
लहान पक्षांची गरज संपली
शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन मोठे प्रादेशिक पक्ष भाजपच्या दावणीला गेल्याने लहान पक्षांचे काय असा प्रश्न आहे. सदाभाउंची रयत क्रांती संघटना, महादेव जानकर यांचा रासप, आरपीआय आठवले गट हे एकेकाळी भाजपच्या खास मर्जीतले होते. त्यांना सत्तेत सामावून घेउन त्यांना खूश करण्याचा प्रयत्न झाला होता कारण त्यावेळी भाजपला लहान लहान पक्षांची गरज होती. परंतु आता ही गरज संपली आहे. सत्तेत सहभागी होवून या पक्षांनी आपले उपद्रव्य मूल्य गमावून बसले आहेत. त्यांची भिती आता कोणालाच उरली नाही. मोठ्या पक्षांवर दरोडा पडत असताना लहान पक्षांना विचारतो कोण अशी अवस्था त्यांची सध्या झाली आहे.
आरपीआप म्हणजे केवळ रामदास आठवले
देशात आणि राज्यात एकेकाळी आरपीआयचा मोठा दबदबा होता. आरपीआपला सोबत घेतल्याशिवाय कोणीही राजकारण करून शकत नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र यायला हवे, असे म्हटले होते. त्यांचा दराराही मोठा होता. परंतु आरपीआयची शकले झाली आणि प्रत्येकाची तोंड वेगवेगळ्या दिशेला झाली. सध्या रामदास आठवले यांचा आरपीआय भाजपसोबत आहे. आरपआयची अवस्थाही सध्या सत्तेसाठी मवाळ झाली आहे. रामदास आठवले यांनाही लोकसभेसाठी जागा मिळणे अवघड झाले आहे.
स्वाभिमानीही फोडण्याचा प्रयत्न
sangli-political-news-small-parties-have-ceased-to-exist
पश्चिम महाराष्ट्रात राजू शेट्ींचा स्वाभिमानी पक्ष मोठा विरोधक होता. शेतकरीही यांच्या बाज्ाुने होते. परंतु सलग दोन खासदारकीला पराभव झाल्याने राजू शेट्टींची अवस्था वाईट झाली आहे. त्यातच गेल्या विधानसभेला त्यांच्या साथीदार असलेले सावकार मादनाईक, वैभव कांबळे, प्रा. जालिंदर पाटील यांनीही स्वाभिमानीला रामराम करून शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. सध्याच्या घडीला स्वाभिमानीचा कोणीही आमदार अथवा खासदार नाही.
एकंदरीत सध्या भाजपला आता कोणाचीही गरज राहिली नाही. त्यांच्या सोबत असलेले रयत क्रांती संघटना, आर. पी. आय यांनाही स्वत:चे चिन्ह राहिले नाही. पुढे मागे स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या निवडणुका लागल्या तरी त्यांना भाजपच्या चिन्हावर लढावे लागणार हे निश्चित.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



