rajkiyalive

शांतीनाथ मंदिराच्या मदतीने समडोळीत सर्वधर्मीय घरे दसर्‍यादिवशी उजळणार

दिनेशकुमार ऐतवडे, 9850652056

विसाव्या शतकातील प्रथमाचार्य 108 शांतीसागर महाराज यांच्या आचार्यपद शताब्दी महोत्सवास दसर्‍यापासून सुरूवात होत आहे. तसेच येथील 1008 भ. शांतीनाथ जिन मंदिरासही शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त समडोळीत मंगळवारी दसर्‍यादिवशी भव्य आणि दिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एक लाख दिव्यांनी संपूर्ण गाव उजळणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये एकही समाज आणि एकही घर सुटणार नाही, याची दक्षता समस्त सकल जैन समाज घेत आहेत.

मिरज तालुक्यातील समडोळी या गावाला अखंड समानतेचा, धार्मिकतेचा, सर्वधर्मसमभावतेचा मोठा वारसा आहे. जैन समाजातील खंडीत झालेली दिगंबर जैन मुनी परंपरा शांतीसागर महाराज यांनी सुरू केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेउन समडोळीतील समस्थ जैन समाजाने येथील शालिनी पाटील मळ्यात त्यांना आचार्य ही पदवी दिली. ही पदवी दि. 8 ऑक्टोंबर 1924 दसर्‍या दिवशी दिली गेली. या कार्यक्रमाास 2024 च्या दसर्‍यादिवशी शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत.

त्यानिमित्त 2023 च्या दसर्‍यापासून शताब्दी वर्ष सुरू होणार आहे. तसेच आचार्य शांतीसागर महाराज यांच्याच आशीवार्दाखाली आणि त्यांच्या सानिध्यात 1008 भ. शांतिनाथ मंदिराची उभारणीही झाली आहे. त्या मंदिरालाही 100 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्त गावात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी 22 रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचीही आयोजन करण्यात आले होते.

दसर्‍या दिवशी लक्ष दीपोत्सव होणार आहे. शांतीनाथ मंदिराच्या ट्रस्टीने यानिमित्त गावातील सर्व घरामध्ये, सर्व समाजामध्ये, सर्व मंदिरांमध्ये, सर्व मंडळांना पणत्यांचे वाटप केले आहे. त्याबरोबर वाती आणि तेलाचेही वाटप करण्यात आले आहे. सध्याच्या या अस्थिर सामाजिक वातावरणामध्ये समडोळीमधील जैन समाजाने सर्व समाजाने एकत्र बांधले आहे. केवळ दीपोत्सवपुरते त्यांना सामावून न घेता संपूर्ण वर्षभर कार्यक्रमात त्यांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

श्र्री 1008 श्र्री शांतिनाथ दिगंबर जिन मंदिर, समडोळीच्या मंदिर निर्माण शताब्दी वर्षानिमित्त 15 फेब्रुवारीते 21 फेब्रुवारी 2024 अखेर आर्ष परंपरेनुसार श्र्री इंद्रध्वज आराधना महामहोत्सव संपन्न होणार आहे. त्यासाठीही रविवारी विविध सवाल काढण्यात आले. येथील धर्मानुरागी माणिक आण्णा खोत आणि सौ. सुजाता माणिक खोत यांना यजमानपदाचा मान मिळाला आहे.

दसर्‍या दिवशी सकाळी साडे पाच वाजता सनई चौघडा, सकाळी सहा वाजता पंचामृत अभिषेक, सव्वा सात वाजता ध्वजारोहण, 8.05 वाजता शांतीज्योत आगमन सोहळा व सवाद्य मिरवणूक, 9.45 वाजता प्रथमाचार्य प्रतिमा पूजन व अभिषेक, 10 वाजता अखंड शांतीज्योत स्थापना, दुपारी 3 वाजता आचार्य श्र्री 108 जिनसेन महाराज ससंघ यांच्या मंगल प्रवचन, सायंकाळी 5.15 मिनिटांनी समडोळी नगरीतून दीप प्रज्वलन करत भव्य कलश रथ सवाद्य मिरवणूक निघणार आहे.

हेही वाचा

समडोळीतील कमान ठरत आहे लक्ष्यवेधी
समडोळीत यजमानपदाचा मान माणिक खोत यांना
समडोळीत जैन समाजाने घालून दिला आदर्श

समडोळीत शांतीसागर गुंफा शिलान्यासची भव्य मिरवणूक

आचार्य शांतीसागर शताब्दी महोत्सव जोरदार करण्याचा संकल्प

या कार्यक्रमासाठी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, सन्मती सेवा दलाचे संस्थापक मिहिरभाई गांधी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सर्व ग्रामस्थांनी व युवक मंडळांनी त्यांना दिलेल्या पणत्या घरासमोर सायंकाळी सव्वा सहा वाजता प्रज्वलित करावे, असे आवाहन शांतीनाथ मंदिराच्या ट्रस्टीने केले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज