rajkiyalive

shantisagar maharaj punyatithi 2024 ; समडोळीत शांतीसागरजी महाराज पुण्यतिथीसाठी जनसागर लोटला

shantisagar maharaj punyatithi 2024 ; समडोळीत शांतीसागरजी महाराज पुण्यतिथीसाठी जनसागर लोटला : विसाव्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य प. पू. 108 शांतीसागरजी महाराज यांच्या 69 व्या पुण्यतिथी महोत्सवासाठी मिरज तालुक्यातील समडोळी येथे अक्षरशा जनसागर लोटला. सुमारे साडी तीन किलोमीटरपर्यंत चारही बाजूला वाहतूक ठप्प झाली होती. अनेकांना मुख्य मंडपाजवळ लांबून चालत यावे लागले. सकाळी 6. 55 ला सुरू झालेला हा महोत्सव सायंकाळी साडे पाच वाजता संपला.

shantisagar maharaj punyatithi 2024 ; समडोळीत शांतीसागरजी महाराज पुण्यतिथीसाठी जनसागर लोटला

आचार्य शांतीसागर महाराज यांना आचार्य ही पदवी देवून 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त समडोळीत आचार्य पदारोहण वर्ष गेल्या दसर्‍यापासून सुरू आहे. गेल्या वर्षभरात अनेक कार्यक्रम घेण्यात आले. यंदाची शांतीसागर महाराज पुण्यतिथीही समडोळीत व्हावी अशी समस्थ समडोळीकरांची मागणी होती. त्यांच्या मागणीला होकार देवून वीर सेवा दल आणि दक्षिण भारत जैन सभेने समडोळीत शांतीसागर महाराज पुण्यतिथीचे आयोजन केले.

गुरूवार 5 रोजी सकाळी सहा वाजून 55 मिनिटांनी 108 वेळा नमोकार महामंत्राचा जाप्यने या कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर शांतीसागर महाराज यांच्या अंतिम उपदेशाचे वाचन करण्यात आले. यावेळी सकाळीच्या सत्रात सौ. शैलजा जयंतराव पाटील यांच्याहस्ते. स्व. राजारामबापू पाटील सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले. सकाळी 10 वाजता गावातील मुख्य रस्त्यावरून अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता रॅली काढण्यात आले. या रॅलीला हजारो श्रावक श्राविकांनी सहभाग घेतला. रॅलीमध्ये अनेक गावातील तरूण मंडळांनी वेगवेगळ्या वेषभूषा, सांस्कृतिक कार्यक्रम, जैन धर्मातील अनेक घटना, शांतीसागर महाराज यांच्या आयुष्यातील घटना यावर जिवंत देखावा सादर केला होता.

शांतीसागर महाराज यांच्या पुण्यतिथीसाठी पहिल्यांदाच व्यासपिठावर 40 मुनी हजर होते. यावेळी आचार्य अनेकांतसागर महाराज, आचार्य वर्धमानसागर महाराज, आचार्य सुयशगुप्त महाराज, आचार्य जिनसेन महाराज, आचार्य धर्मभूषण महाराज, निर्यापक श्रमण धर्मसागर महाराज, निर्यापक श्रमण विद्यासागर महाराज, विशालसागरजी महाराज, धवलसागरजी महाराज, नांदणी, कोल्हापूर मठाचे भट्टारक यांचे प्रवचन झाले.

यावेळी खासदार विशाल पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, दक्षिण भारत सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार संजयकाका पाटील, आमदार राजेेंद्र पाटील यड्रावकर, शैलजाभाभी पाटील, राहूल महाडिक, पृथ्वीराज पवार, गौरव नायकवडी आदी उपस्थित होते. दिवसभर सूत्रसंचालन वीर सेवा दलाचे कार्यवाहक अजित भंडे यांनी केले. संयोजन अरूण पाटील, शशिकांत राजोबा यांच्यासह वीर सेवा दलाचे सर्व पदाधिकार्‍यांनी केले.

यावेळी शांतीनाथ मंदिराचे अध्यक्ष अशोक मगदूम, आदीनाथ मंदिराचे अध्यक्ष रवी खोत, महावीर जिन मंदिरचे सुरेश पाटील, चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष वैभव पाटील, बापूसो ढोले यांच्यासह सकल जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज