sangli crime news : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या शेजार्याचा खून : पेठ ता.वाळवा येथे दोन सख्ख्या भावांमध्ये किरकोळ कारणावरून सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या शेजार्यालाच चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवार दि.31 डिसेंबर रोजी रात्री नऊ च्या सुमारास हा प्रकार घडला. खूनाच्या गुन्हयातील आरोपीला इस्लामपूर पोलिसांनी 3 तासात जेरबंद केले.
sangli crime news : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या शेजार्याचा खून
सचिन सुभाष लोंढे (वय, 37, रा.अण्णाभाऊ साठेनगर, पेठ, ता.वाळवा) असे मृताचे नाव आहे. खूनप्रकरणी संग्राम कमलाकर शिंदे (पेठ) याला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मंगळवार दि.31 डिसेंबर रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास भीमनगर बोर्डाजवळ अण्णाभाऊ साठेनगर येथील संग्राम शिंदे आणि त्याचा मोठा भाऊ शरद शिंदे या दोघा भावांमध्ये किरकोळ कारणावरुन भांडण सुरू होते. दरम्यान सचिन लोंढे हे भांडण सोडवण्यास गेले. तु आमच्या भावांच्या भांडणामध्ये यायचे नाही असे म्हणत रागाने संग्राम शिंदे याने हातातील चाकू सचिन लोंढे यांच्या छातीत खूपसून गंभीर जखमी केले. घटनेनंतर एकच खळबळ माजली.
परिसरातील लोकांनी सचिन लोंढे यांना इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला,
परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान ही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खून प्रकरणातील आरोपी संग्राम शिंदे हा पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. पोलिसांनी तात्काळ त्याचे मोबाईल लोकेशन शोधले. पो.नि.संजय हारूगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.किरण दिडवाघ, पो.कॉ.अमोल सावंत, शशिकांत शिंदे, विशाल पांगे, दिपक घस्ते यांच्या पथकाने नेर्ले गावच्या हद्दीतच त्याला ताब्यात घेतले. याबाबतची फिर्याद राजेंद्र सुभाष लोंढे यांनी दिली आहे. अधिक तपास स.पो.नि.किरण दिडवाघ करत आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.