rajkiyalive

chandoli dam news : चांदोली धरणाचे दरवाजे उघडले… 4500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू……

chandoli dam news : चांदोली धरणाचे दरवाजे उघडले… 4500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू……:  चांदोली धरण पाणलोटक्षेत्रात पडणार्या पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असुन धरणाची पाणीपातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी आज दुपारी साडेबारा वाजता चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे 0.50 मीटरने उचलुन धरणाच्या सांडव्यातुन वारणानदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.

chandoli dam news : चांदोली धरणाचे दरवाजे उघडले… 4500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू……

प्रारंभी पाटबंधारे विभाग कोडोली उपअभियंता बी. आर. पाटील वारणावती शाखा अभियंता सुदाम कुंभार यांच्याहस्ते पाणीपूजन करण्यात आले. यावेळी चांदोली धरण विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

सध्या धरणाच्या चारीही वक्राकार दरवाजातुन 2870 क्युसेक तर वीजनीर्मिती केंद्रातुन 1630 क्युसेक असा एकूण 4500 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणानदीपात्रात सोडण्यात आल्याने वारणाननदीचे पाणी पात्राबाहेर पडले असुन चांदोली धरण प्रशासनाकडुन नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
चांदोली परिसरात पडणार्या पावसाचा जोर कायम असल्यामुळेया परीसरात पडणार्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणलोटक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ होत आहे.सध्या धरणाची पाणी पातळी 619.20 मीटर इतकी आहे.

chandoli-dam-news-chandoli-dam-gates-opened-4500-cusecs-of-water-released

तर धरणात सध्या 27 टि.एम सी म्हणजेच 74.22 टक्के पाणीसाठा झाला आहे परीसरात पडणार्या पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता असुन नदीकाठची ऊस व भात शेती पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सावधानता बाळगावी अशा सुचनाही धरण प्रशासन विभागाकडुन देण्यात आल्या आहेत.

चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज सकाळी आठ वाजेपर्यंत 24 तासात 56 मिलीमीटर इतक्या पावसासह आज अखेर एकुण 1292 मीलीमीटर पाऊस पडल्याची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज