rajkiyalive

jayant patil news : सांगलीच्या घरपट्टीप्रश्नावर जयंत पाटील विधानसभेत कडाडले

jayant patil news : सांगलीच्या घरपट्टीप्रश्नावर जयंत पाटील विधानसभेत कडाडले : मनपा क्षेत्रातील अन्यायकारक घरपट्टी वाढ रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी विधानसभेत केली. त्यावर उत्तर देताना सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, घरपट्टीवाढबाबत दोन सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल आल्याशिवाय घरपट्टीवाढ होणार नसल्याचे खुलासा त्यांनी केला.

jayant patil news : सांगलीच्या घरपट्टीप्रश्नावर जयंत पाटील विधानसभेत कडाडले

महापालिका क्षेत्रात घरपट्टीची वाढ झाली आहे. मिरज व कुपवाड येथील मालमत्ताधारकांना वाढीव घरपट्टीच्या नोटीसा दिल्या आहेत. त्यावर हरकती मागविल्या आहेत. तर दुसरीकडे सांगली विभागात नोटीसा दिल्या जात आहेत. नोटीसा दिल्यानंतर त्यावर हरकती घेण्यासाठी 21 दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे घरपट्टी वाढीचा विषय चांगलाच गाजत आहे. गुरूवारी बोलविलेल्या माजी पदाधिकार्‍यांच्या बैठकीत देखील गदारोळ झाला होता.

शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी विधानसभेत वाढीव घरपट्टीचा विषय मांडला. आ. जयंत पाटील म्हणाले, सांगली महापालिकेत घरपट्टीच्या दरात तीनपट वाढ झालेली आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने ही अन्यायकारक घरपट्टी वाढ रद्द करायला हवी. मोठ्या प्रमाणात घरपट्टी वाढ झाल्याने लोक हवालदील झाले आहेत. 2003-04 ला झालेल्या घरपट्टी वाढीला कोणताही आधार नव्हता. त्यामुळे सध्याच्या घरपट्टी वाढीला स्थगिती द्यावी व संबंधितांची बैठक बोलवावी, अशी केली.

jayant-patil-news-jayant-patil-strongly-criticized-the-sangli-housing-issue-in-the-assembly

यावर उत्तर देताना सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, घरपट्टी वाढीबाबत महापालिकेत दहा दिवसांपूर्वी बैठक घेतली होती. दोन अधिकार्‍यांची समिती देखील नेमली आहे. त्याचा अहवाल येईपर्यंत वाढीव घरपट्टी वसूल करू नये. अशा सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज