rajkiyalive

jayant patil news : राजारामबापू कारखान्यावर रविवारी श्रीराम जन्मोत्सव

jayant patil news : राजारामबापू कारखान्यावर रविवारी श्रीराम जन्मोत्सव : दरवर्षीप्रमाणे हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील राम मंदीरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा आज (रविवारी) मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

jayant patil news : राजारामबापू कारखान्यावर रविवारी श्रीराम जन्मोत्सव

सकाळी कीर्तन,दुपारी 12 वाजता जन्मोत्सव सोहळा आणि सायंकाळी गदिमा विरचित आणि बाबूजी स्वररचित अजरामर कलाकृती गीत रामायणचे विशेष आयोजन केलेले आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी केले.

सकाळी 10 वाजता ह.भ.प.दादा महाराज येलूरकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. दुपारी 12 वाजता जन्मोत्सव सोहळा आणि आरती राजारामबापू साखर कारखान्याच्या जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.दिपलक्ष्मी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यानंतर सुंठवडा आणि प्रसाद वाटप होईल. तर सायंकाळी 5.30 वाजता सांगली जिल्ह्याचे सुपुत्र ग.दि.माडगुळकर लिहिलेले आणि ख्यातनाम संगीतकार स्व.सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या ’गीत रामायण’या अजरामर कलाकृतीचे आयोजन केलेले आहे. सांगली येथील स्वरवैभव क्रिएशनचे गायक कलाकार हे ’गीत रामायण’ सादर करणार आहेत.

jayant-patil-news-shri-ram-janmabhoomi-celebrated-on-sunday-at-rajarambapu-factory

लोकनेते राजारामबापू पाटील यांनी 42 वर्षांपूर्वी पायाभरणी केलेले आणि माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी त्याचा कळस चढविलेले कारखाना कार्यस्थळावरील राम मंदीर हे परिसरातील भाविकांचे श्रध्दास्थान ठरले आहे. या मंदीरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जातो. तसेच सातत्याने भजन,कीर्तन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज