rajkiyalive

jayashri patil news : जयश्रीताई पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

jayashri patil news : जयश्रीताई पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश: काँग्रेस पक्ष दिशाहिन झाला आहे. आम्ही विरोधी पक्षात असतानाही देशहिताची लाईन कधी सोडली नाही. ज्यांना काम करायचं आहे, त्यांना आपले भवितव्य त्याठिकाणी दिसत नाही. कुणाचा पायपोस कुणाच्यात नाही. काँग्रेसने मदनभाऊ घराण्यावर अन्याय केला आहे, मात्र भाजपमध्ये योग्य काळजी घेवून संधी दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांना दिले.

jayashri patil news : जयश्रीताई पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मदनभाऊ घराण्यांवर काँग्रेसकडून अन्याय : देवेंद्र फडणवीस

मुंबईत काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आ. पृथ्वीराज देशमुख, शेखर इनामदार, समित कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

जयश्रीताई यांच्यासह कार्यकर्त्यांची योग्य काळजी घेतली जाईल

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी भाजप प्रवेशासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वतः चर्चा करुन त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. जयश्रीताई भाजपमध्ये आल्यावरव त्यांचा योग्य निर्णय झाला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यानुसार जयश्रीताई पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केला आहे. आपण आता भाजप परिवारामध्ये सहभागी झाला असून त्यांचे स्वागत आहे. येथे परिवारासारखी वागणूक सर्वांना दिली जाईल. . ज्या-ज्या ठिकाणी व्यक्ती निश्चित वाटते. त्याठिकाणी संधी देणे आमचे कर्तव्य आहे, त्याबाबत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि जेष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून निर्णय घेतला जाईल.

फडणवीसांच्या नेतृत्वात विकासासाठी काम करणार ः जयश्रीताई पाटील

जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या म्हणाल्या, राज्याचे जेष्ठ दिवंगत नेते वसंतदादा, विष्णूआण्णा, प्रकाशबापू आणि मदनभाऊ यांनी सर्वसामान्य जनतेसाठी राजकारण आणि समाजकारण केले. यापुढील काळात देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीच्या विकासासाठी काम करण्यात येईल. सांगलीतील शेरीनाल्यासह प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु.

मदनभाऊ यांच्या निधनानंतर मला राजकारण्यात यायला सांगितले.

कार्यकर्त्यांसाठी मी राजकारणात आले. तुम्हांला आधार दिला. मदनभाऊंच्या संस्थावर काम करीत असून त्या चांगला पद्धतीने चालवित आहे. आत्तापर्यंत काँग्रेस पक्षाने आम्हांला काय दिले, हे सर्वांना माहिती आहे. दरवेळी आपली वेळ आली की आमच्यावर अन्याय झाला असे म्हणायचे. विधानसभा अपक्ष म्हणून लढविल्यानंतर कोणत्या पक्षात यायचे याबाबत चर्चा सुरु होत्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोनवेळा कामाबाबत भेटले होते. राज्याचे नेतृत्व कसे असावे, हे मला भेटीमध्ये जाणवले. त्यावेळी मी ठरवले भाजपमध्ये प्रवेश करायचा. मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली, तुम्ही माझ्या प्रवेशावेळी आला पाहिजे. ते मान्य केले, हे अभिमानाचे आहे. दरम्यान प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रवेश करणार्‍यांची नावे घेवून स्वागत केले.

माजी महापौर, उपमहापौरासह नगरसेवकांचा प्रवेश

माजी महापौर किशोर शहा, किशोर जामदार, कांचनताई कांबळे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, प्रशांत पाटील-मजलेकर, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, संतोष पाटील, शेवंता वाघमारे, रोहिणी पाटील, मृणाल पाटील, करण जामदार, अजित सूर्यवंशी, सांगली बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील, सुभाष यादव, जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष सुनिल जाधव, माजी सरपंच निवास पाटील, तानाजी पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रविण पाटील, माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब पाटील यांच्यासह मदनभाऊ युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंदा लेंगरे, शितल लोंढे, प्रविण निकम, अमित लाळगे, शहाजी सरगर यांच्यासह पदाधिकार्‍यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

सांगलीतील मोठे घराणे यायचं होते, ते आले

पश्चिम महाराष्ट्रातून मोठे नेते भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा करता. ते अवेटेड आहेत, असे तुम्हांला वाटते. आत्ता तरी आमच्यासमोर असं काही चर्चेत नाही. सांगली जिल्ह्यातील जे मोठे घराणे यायचं होते, ते आलेले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज