rajkiyalive

kolhapur news : रोटावेटर मध्ये अडकून शेतकरी ठार पत्नी जखमी

kolhapur news : रोटावेटर मध्ये अडकून शेतकरी ठार पत्नी जखमी : भालेकरवाडी (ता. भुदरगड) येथे शेतात नांगरट करत असताना रोटावेटरखाली सापडून शेतकरी जागीच ठार झाला. मारुती नारायण भालेकर (वय 45) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. तर पत्नी शोभा मारुती भालेकर (40) या रोटावेटर उचलण्याच्या प्रयत्नात रोटावेटरमध्ये दोन्ही पाय सापडल्याने गंभीर जखमी झाल्या.

kolhapur news : रोटावेटर मध्ये अडकून शेतकरी ठार पत्नी जखमी

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी सकाळी आठ वाजता मारुती भालेकर हे आपली पत्नी शोभा यांच्यासोबत ’बांबर’ नावाच्या शेतात भात लागणीसाठी नांगरट करण्यासाठी रोटावेटर घेऊन गेले होते. शेतातील काही भाग त्यांनी नांगरला. एका वाफ्यातून दुसर्‍या वाफ्यात बांधावरून दोघेही रोटावेटर उतरत असताना तोल सांभाळता न आल्याने मारुती रोटावेटरच्या नांग्यांवर पडले. चालू अवस्थेत रोटावेटरचे नांगे पोटात घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी शोभा नवर्‍याला वाचवण्याच्या प्रयत्नात साडीचा पदर ट्रॅक्टरच्या नांग्यात अडकल्याने त्याही रोटावेटरमध्ये ओढल्या गेल्या. ट्रॅक्टरचे नांगे त्यांच्या दोन्ही पायात घुसले. ट्रॅक्टरच्या नांग्यांसह त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मारुती यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.

भालेकरवाडीवर शोककळा

भालेकर कुटुंब हे शेतीत राबाणारे असून कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे. मृत मारुती भालेकर यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. मुलगा प्रथमेश बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. मोठी मुलगी प्राजक्ता आठवीमध्ये तर प्रतीक्षा सहावीमध्ये आहे. या घटनेमुळे भालेकर कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. विधवा आई, मुलांनी व नातेवाइकांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. रात्री साडेआठच्या सुमारास मारुती यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Farmer killed, wife injured after getting stuck in rotavator

सध्या शेतीसाठी लागणार्‍या अवजारांमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. आधुनिक अवजारांमुळे शेतीच्या कामांना गती आली आहे. ही आधुनिक अवजारे हाताळणे सोपे वाटत असल्याने शेतकरी अशी अवजारे स्वतःच्या कल्पकबुद्धीने चालवायला शिकतात; पण त्यामधील सूक्ष्म बारकावे व धोके यांची माहिती नसल्याने अपघात घडतात. दरवर्षी पॉवर टिलर व रोटावेटरमध्ये सापडून अनेक जण मृत्युमुखी पडतात. तर काहीजण कायमचे जायबंदी होतात. यासाठी अवजारे निर्मिती करणार्‍या कंपनी व कृषी विभागाने अशी अवजारे हाताळण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज