rajkiyalive

SAMDOLI : विद्यासागर महाराजांचा 21 रोजी समडोळीत मंगल प्रवेश

SAMDOLI : विद्यासागर महाराजांचा 21 रोजी समडोळीत मंगल प्रवेश : विसाव्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य शांतीसागर महाराज यांच्या आचार्य पदारूढ शताब्दी वर्षानिमित्त मिरज तालुक्यातील समडोळी येथे श्र्री 1008 भ. महावीर दिगंबर जिनमंदिरच्यावतीने भव्य असे चातुर्मास होणार आहे.

SAMDOLI : विद्यासागर महाराजांचा 21 रोजी समडोळीत मंगल प्रवेश

या चातुर्माससाठी आचार्य सन्मतीसागर महाराज यांचे शिष्य निर्यापक श्र्रवण प. पू. 108 विद्यासागरजी महाराज, निर्यापक श्र्रवण 108 धर्मसागरजी महाराज, प. पू. 108 अजितसागरजी महाराज, प. पू. 108 आगमसागरजी महाराज, प. पू. 108 अनेकांतसागरज महाराज यांचे भव्य असा मंगल प्रवेश समडोळीत होणार आहे. रविवार सकाळी 8 वाजता त्यांची समडोळी स्टँडपासून भव्य शोभायात्रा निघणार आहे. यावेळी रथ, घोडे, वाद्यपथक असणार आहे

शालिनी ग्राउंडवर भव्य असा शामियाना उभा करण्यात आला आहे

मिरज तालुक्यातील समडोळी येथील श्र्री 1008 भ. महावीर दिगंबर जिन मंदिरच्यावतीने 12 वर्षापूर्वी आचार्य शितलसागरज महाराज यांचा चातुर्मास झाला होता. त्यानंतर यंदा चातुर्मास होत आहे. 20 व्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य शांतीसागर महाराज यांच्या आचार्य शताब्दी समारोहानिमित्त भव्य चातुर्मासचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. येथील शालिनी ग्राउंडवर भव्य असा शामियाना उभा करण्यात आला आहे. गावात स्वागत कमानी, पंचरंगी झेंडे लावण्यात आले आहेत.

आचार्य शांतीसागरजी महाराज यांना 1924 च्या दसर्‍या दिवशी समडोळीत आचार्य ही पदवी देण्यात आली होती. वीसाव्या शतकातील प्रथमाचार्य अशी त्यांची ओळख आहे. त्या समारंभाला यंदा 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून समडोळी नगरीत भरगच्च कार्यक्रम होत आहेत.

रविवार 28 जुलै रोजी चातुर्मास कलश स्थापना होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज