rajkiyalive

sangli crime news : कवठेपिरानमध्ये तरुणास टोळक्याने केली बेदम मारहाण : मारहाण करणार्‍या चौघांवर गुन्हा दाखल.

सांगली :

sangli crime news : कवठेपिरानमध्ये तरुणास टोळक्याने केली बेदम मारहाण : मारहाण करणार्‍या चौघांवर गुन्हा दाखल. : मिरज तालुक्यातील कवठेपिरान ते कारंदवाडी जाणार्‍या मार्गावर मोटारसायकलवरून निघालेल्या तरुणाचा पाठलाग करून रागाने का बघतोस असे म्हणत लोखंडी रॉड, शॉकअपसरच्या पाईपसह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. सदर मारहाणीचा प्रकार हा मंगळवार दि. 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडला.

sangli crime news : कवठेपिरानमध्ये तरुणास टोळक्याने केली बेदम मारहाण : मारहाण करणार्‍या चौघांवर गुन्हा दाखल.

या प्रकरणी जखमी आदित्य राजेंद्र सुतार (वय 23 रा. कवठेपिरान) याने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणार्‍या जयराज उर्फ पिट्या साळुंखे, गणेश कुंभार, धनाजी परीट आणि पावन साळुंखे (सर्व रा. कवठेपिरान) या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, जखमी आदित्य सुतार हा आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कवठेपिरान गावातील चौगुले प्लॉट येथे राहतो. मंगळवार दि. 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास आदित्य हा त्याचा मित्र ओम पाटील याच्या सोबत मोटारसायकलवरून कवठेपिरान ते कारंदवाडी मार्गावरून निघाला होता. यावेळी संशयित चौघेजण त्यांच्या पाठीमागून आले. त्यांनी आदित्य याची मोटारसायकल थांबवली.

संशयित जयराज साळुंखे याने तू माझ्याकडे काय बघतोस, तुला मस्ती आल्या काय असे म्हणून सर्वजण शिवीगाळ करू लागले. संशयित गणेश कुंभार याने त्याच्या जवळील शॉकअपसरच्या पाईप ने मारण्यास सुरवात केली. संशयित साळुंखे याने लोखंडी रॉड ने पायावर मारहाण केली. उर्वरित दोघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यानंतर आदित्यला त्यांच्या गाडीवरून गावातील पाण्याच्या टाकीजवळ आणून तेथे पुन्हा मारहाण केली. घडलेल्या या घटनेनंतर जखमी आदित्य सुतार याने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणार्‍या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज