rajkiyalive

SANGLI CRIME NEWS : पुन्हा इलेक्ट्रिक दुचाकी ने घेतला पेट : आगीत दोन दुचाकी जळाल्या.

सांगली :

SANGLI CRIME NEWS : पुन्हा इलेक्ट्रिक दुचाकी ने घेतला पेट : आगीत दोन दुचाकी जळाल्या. : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सभास्थळापासून काही मीटर अंतरावर महापालिका संकुलाच्या पार्किंगमधील इलेक्ट्रीकल दुचाकीने अचानक पेट घेतला. त्यामुळे पोलिसांची मोठी धावपळ उडाली. पार्किंगमधून धुराचे लोट, फटाक्यासारखा आवाज येऊ लागल्याने घबराट पसरली होती. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या आगीत दोन दुचाकीचे मोठे नुकसान झाले.

SANGLI CRIME NEWS : पुन्हा इलेक्ट्रिक दुचाकी ने घेतला पेट : आगीत दोन दुचाकी जळाल्या.

मनोज जरांगे पाटील यांची राममंदिर चौकात सभा होती. सायंकाळी सभेला मोठी गर्दी झाली होती. पोलिसांचाही बंदोबस्त तैनात होता. सभा सुरू असताना काही अंतरावरील महापालिकेच्या वि. स. खांडेकर संकुलात आगीची घटना घडली. या संकुलाच्या तळमजल्यावर पार्किंग व्यवस्था आहे. सभेसाठी आलेल्यांनी तळमजल्यावर वाहने पार्क केली होती.

यावेळी पार्किंगमध्ये 20 हून अधिक दुचाकी व चार ते पाच चारचाकी वाहने होती. सायंकाळी सातच्या सुमारास एका इलेक्ट्रीकल दुचाकीने अचानक पेट घेतला. पाहता पाहता आगीने जोर धरला. त्यामुळे धुराचे लोट येऊ लागले. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी पार्किंगमध्ये शिरले. तोपर्यंत इलेक्ट्रीकल गाडीच्या शेजारील गाडीनेही पेट घेतला. फटाके वाजल्यासारखे आवाजही येऊ लागले.

महापालिकेच्या अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. पण पार्किंग जागेपर्यंत पोहोचण्यासाठी अपुरी जागा, त्याच रस्त्यावर केलेली सजावटीमुळे अग्निशमनची गाडी आगीच्या ठिकाणी जाण्यास विलंब झाला. तोपर्यंत इलेक्ट्रीकल गाडी जळून खाक झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

यावेळी दोन दुचाकी जळल्या. इतर वाहनांना आगीपासून वाचविण्यात यश आले. पोलिस निरीक्षक संजय मोरे व त्यांच्या पथकाने गर्दी हटविली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज