rajkiyalive

sangli crime news : ऊस तोडणी मजूर पुरवण्याच्या बहाण्याने समडोळीत शेतकर्‍यास 5 लाखाचा गंडा

सांगली :

sangli crime news : ऊस तोडणी मजूर पुरवण्याच्या बहाण्याने समडोळीत शेतकर्‍यास 5 लाखाचा गंडा : मिरज तालुक्यातील समडोळी गावामध्ये राहणार्‍या एका शेतकर्‍याला ऊस तोडणी मजूर पुरविण्याचे आश्वासन देऊन तब्बल पाच लाख 30 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. सदर फसवणुकीची घटना हि सण 2014 आणि 2015 या कालावधीत घडली.

sangli crime news : ऊस तोडणी मजूर पुरवण्याच्या बहाण्याने समडोळीत शेतकर्‍यास 5 लाखाचा गंडा

या प्रकरणी जगन्नाथ दादू मस्कर (वय 39 रा. समडोळी) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणार्‍या बबन किसान राठोड (वय 50 रा. कलिफनाथ तांडा, जि. बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, जगन्नाथ मस्कर हे आपल्या कुटुंबीयांस मिरज तालुक्यातील समडोळी गावामध्ये राहतात. त्यांची शेती असून ऊस तोडणी मुकादम म्हणून ते मजूर पुरवतात. मस्कर यांची संशयित बीड जिल्ह्यातील बबन राठोड याच्याशी ओळख झाली होती. राठोड याने मस्कर यांना ऊस तोडणी मजूर पुरविण्याचे आश्वासन दिले होते.

त्याच्यावर विश्वास ठेऊन सण 2014 ते 2015 या कालावधीच्या हंगामात तोडणी मजूर पुरविण्यासाठी मस्कर यांच्याकडून 7 लाख रुपये घेतले. पैसे घेऊनही राठोड याने मजूर पुरविले नाहीत. पैशांबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन पैसे मजुरांना दिल्याचे राठोड यांनी सांगितले. यानंतर मस्कर यांना राठोड याने 70 हजार रुपये परत दिले. उर्वरित पैसे परत देण्यासाठी राठोड हा टाळाटाळ करू लागले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच मस्कर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणार्‍या संशयित राठोड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज