rajkiyalive

SANGLI CRIME : सांगलीत ठार मारण्याची धमकी देत 60 लाखांची मागितली खंडणी

SANGLI CRIME : सांगलीत ठार मारण्याची धमकी देत 60 लाखांची मागितली खंडणी : सांगली : संजयनगर परिसरातील सह्याद्रीनगर मध्ये राहणार्‍या व्यावसायिकाला आणि त्याच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी देत पुण्याच्या टोळीने सांगलीतील साथीदारांच्या मदतीने तब्बल 12 लाखांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सदरची घटना हि दि. 10 मे 2024 ते दि. 17 मे 2024 या कालावधीत सांगली आणि तुरची फाटा येथे घडली. या प्रकरणी अक्तरमिया नालसो शेख (वय 49) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

SANGLI CRIME : सांगलीत ठार मारण्याची धमकी देत 60 लाखांची मागितली खंडणी

सांगलीतील व्यावसायिकाकडून 12 लाख रुपये उकळले : सांगलीतील साथीदारासह पुण्यातील अज्ञात चौघांवर गुन्हा दाखल.

त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संजयनगर मधील टोळीचा साथीदार यासिन खलील इनामदार (रा. हडको कॉलनी, सांगली) याच्यासह पुण्यातील अज्ञात चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संशयित यासिन इनामदार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून गुन्ह्यात धमकावण्यासाठी रोव्हॉल्वरचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अक्तरमिया शेख हे आपल्या कुटुंबियांसह संजयनगर परिसरातील सह्याद्रीनगर येथे राहतात त्यांचा कन्स्ट्रक्शन चा व्यवसाय आहे. दि. 10 मे 2024 रोजी संशयित यासिन इनामदार हा शेख यांना भेटला. इनामदार याच्या मोबाईल मध्ये आलेला फोटो दाखवून शेख याना ठार मारण्याची सुपारी कोणीतरी पुण्याच्या पार्टीला दिली आहे. त्याची भेट घालून देतो असे सांगितले. शेख आणि त्यांच्या नातेवाईकांची सुपारी घेतलेल्या पुण्याच्या पार्टी सोबत इनामदार याने कराड येथे भेट घडवून आणली.

त्यामध्ये पुण्यातील टोळीच्या चार अज्ञात सदस्यांनी 60 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर दि. 17 मे 2024 रोजी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जीवे मारण्याची भीती घालून यासिन इनामदार आणि चार अनोळखी संशयितांनी तुरची फाटा येथे 12 लाख रुपयांची खंडणी घेऊन गेले. घडलेल्या या प्रकारानंतर शेख यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने संशयित इनामदार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पुण्याच्या टोळीने सांगलीत येऊन खंडणी मागितल्याचा घटनेनं खळबळ उडाली होती.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज