rajkiyalive

SANGLI FLOOD NEWS : पुरामुळे सांगलीतील 80 कैद्यांचे कोल्हापूर कारागृहात स्थलांतर

सांगली :

SANGLI FLOOD NEWS : पुरामुळे सांगलीतील 80 कैद्यांचे कोल्हापूर कारागृहात स्थलांतर : धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि धरणातील विसर्ग यामुळे सांगलीतील पाण्याची पातळी वाढली आहे. काही भागांत पुराचे पाणी शिरले आहे. 2019 आणि 2021 ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता कारागृह प्रशासन सतर्क झाले आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कारागृहातील कैद्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी 80 कैद्यांचे कळंबा कारागृहात स्थलांतर केले. पुढील सतर्कता पाहून आणखी काही कैद्यांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती कारागृह अधीक्षक महादेव होरे यांनी दिली.

SANGLI FLOOD NEWS : पुरामुळे सांगलीतील 80 कैद्यांचे कोल्हापूर कारागृहात स्थलांतर

कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने सांगलीत पुन्हा पूर स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील काही भागामध्ये पाणी आल्यानंतर कारागृह प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यात 2005, 2019 आणि 2021 च्या महापुराच्या काळात कारागृहातील कैद्यांचे स्थलांतर करण्यात आले होते.

गुरुवारी 80 कैद्यांचे कळंबा कारागृहात स्थलांतर करण्यात आले आहे. 

यंदाही पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे कारागृह प्रशासनाने सुरक्षिततेसाठी कैद्यांचे स्थलांतर करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी घेतली आहे. गुरुवारी 80 कैद्यांचे कळंबा कारागृहात स्थलांतर करण्यात आले आहे. 2019 मध्ये कारागृहात महापुराचे पाणी आल्यानंतर दोन कैदी पळाल्याचा प्रकार घडला होता. कैद्यांच्या सुरक्षिततेसाठी कारागृह प्रशासनाने यंदा लवकरच हालचाली करत पहिल्या टप्प्यात 80 कैदी कळंबा कारागृहात स्थलांतरित केले. उर्वरित कैदी स्थलांतराची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.

स्थलांतर करण्यात येत असलेल्या कैद्यांमध्ये गंभीर गुन्ह्यातील कैद्यांचा समावेश आहे.

सांगली जिल्ह्यात जी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा सामना करण्यासाठी जिल्हा कारागृह प्रशासन सज्ज झाले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आतापर्यंत 80 कैद्यांना कोल्हापूर येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये 20 महिला आणि 60 पुरुष कैद्यांचा समावेश आहे.

जेल मध्ये असलेली अत्यावश्यक साहित्य, कागदपत्रे या सुरक्षित स्थळी नेण्यात आली आहेत.

कारागृहामध्ये वैद्यकीय कक्ष 24 तास कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हा कारागृहात देखील आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आला असून तो पूर्णपणे सतर्क आहे. पुराचा धोका वाढल्यास आणखी कैद्यांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती कारागृह अधीक्षक महादेव होरे यांनी दिली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज