rajkiyalive

SANGLI : इरळीत 245 कोटी रूपयांचे ड्रग्ज जप्त

कवठेमहांकाळ – जनप्रवास 
SANGLI : इरळीत 245 कोटी रूपयांचे ड्रग्ज जप्त : मुंबई येथील गुन्हे शाखेच्या अधिकारी वर्गाने कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथील एम.डी.ड्रग्ज तयार करणार्या कारखान्यावर छापा टाकून सुमारे 245 कोटी रूपयांचे 122:5 किलो वजनाचे ड्रग्ज जप्त केले.मुंबई येथील गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय गोपनियता राखत सोमवारी ही कारवाई केली आहे.

SANGLI : इरळीत 245 कोटी रूपयांचे ड्रग्ज जप्त

कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथील रहिवासी असलेला व सध्या पंधरा ते सतरा वर्षे मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या मुख्य संशयीत हा ड्रग्ज तस्करी करीत असल्याची माहिती मुंबई मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे इरळी,डोर्ली, ढालेवाडी व ढालगांव या चार गावांच्या सिमेवर व द्राक्ष बागांच्या शेतातील शेडमध्ये निर्मनुष्य ठिकाणी असलेल्या ड्रग्ज तयार करण्यात येत असलेल्या कारखान्यावर सोमवारी दिवसभर छापा टाकला.

मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी एम.डी.ड्रग्ज साखळीचा पर्दाफाश केला आहे. सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथेही एम.डी. ड्रग्जवर फार मोठी कारवाई काही दिवसापूर्वी केली होती.आज सोमवारी इरळी येथे ड्रग्ज साखळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.मुंबई येथील ड्रग्ज रॅकेट कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामीण भागात पोहचले आहे.याची चर्चा सुरू आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाने आज शेत मालक वासूदेव लक्ष्मण जाधव रा.ढालेवाडी यास ताब्यात घेतले आहे.मुख्य संशयीत ठाणे येथे रहात असल्याचे बोलले जात आहे.तर पोलिसानी ड्रग्ज तयार करणार्या कच्च्या मालासह केमिकल,मशिनरी, मिस्कर असे सर्व साहित्य जप्त केले.असे समजते

गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी सहा संशयित कामगारांना ताब्यात घेतले आहे. ही धाडशी कारवाई रविवारी सकाळ पासून सोमवारी दिवसभर सुरू होती. मुंबई येथील गुन्हे विभागाचे मुख्य गीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली आहे.यावेळी सांगली,कवठेमहांकाळचे पोलीस उपस्थित होते.विभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे व कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज