rajkiyalive

SANGLI LOKSABHA : भाजपमध्ये आणखी पाच जण चर्चेत

जनप्रवास । प्रतिनिधी

सांगली ः सांगली लोकसभेसाठी भाजपमध्ये उमेदवारीचा घोळ सुरुच आहे. विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना पृथ्वीराज देशमुख यांनी आव्हान दिल्यानंतर आणखी पाच जणांची नावे केंद्रीय निवड समितीकडे पाठविण्यात आली आहेत. यामध्ये आमदार सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि प्राजक्ता कोरे यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.

SANGLI LOKSABHA : भाजपमध्ये आणखी पाच जण चर्चेत

आ. गाडगीळ, पडळकर, संग्रामसिंह देशमुख, प्राजक्ता कोरे यांचा समावेश

लोकसभेच्या निवडणूकीचा लवकरच बिगुल वाजणार आहे. राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. भाजप उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकही नाव नाही. त्यामुळे इच्छुकांमध्ये धास्ती वाढली आहे. सांगलीसाठी काँग्रेस, भाजपाचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत. मात्र काँग्रेसकडून युवा नेते विशाल पाटील यांचे चर्चेत असताना उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

 भाजपाकडून विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनी तयारी केली आहे.

माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी आव्हान दिले आहे. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या नावाचीही चर्चा आहे. भाजपाकडून उमेदवारी देताना नवीन चेहर्‍याला संधी देवून धक्का देण्याची शक्यता आहे. सांगली लोकसभेसाठी भाजपाकडून आणखी चार नवीन नावे केंद्रीय समितीकडे पाठविण्यात आल्याची चर्चा सुरु आहे.

यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेच माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, प्राजक्ता कोरे आणि माजी जिल्हाध्यक्ष शिंदे यांचा समावेश आहे. खासदार संजयकाका पाटील आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यापैकी कोणाला उमेदवार मिळणार याची चर्चा सुरू असताना नवीन नावे गेल्याने इच्छुकांमध्ये आणखी धाकधूक वाढली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज