rajkiyalive

MARATHA RESARVATION : मराठा सर्वेक्षणात गावंच दिसेनात, नोंदणी होईना

MARATHA RESARVATION : मराठा सर्वेक्षणात गावंच दिसेनात, नोंदणी होईनाजिल्ह्यात सर्वेक्षणाचा बोजवारा 

MARATHA RESARVATION : मराठा सर्वेक्षणात गावंच दिसेनात, नोंदणी होईना

जनप्रवास । प्रतिनिधी
मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेनुसार हाती घेतलेल्या सर्वेक्षणाचे काम सुरु होताच दुसर्‍या दिवशी अ‍ॅपमध्ये नोंदणीचा अडथळा निर्माण झाला. याशिवाय अनेक गावंच दिसत नसल्याने प्रगणकांना काम करता आले नाही. तर काही ठिकाणी सर्व्हर डाऊनचा अडथळा निर्माण झाल्याने कामात खंड पडला. त्यामुळे मराठा सर्वेक्षणाचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले.

 

 

राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार राज्यात मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. जिल्ह्यात पाच हजार प्रगणकांची नेमणूक केली असून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत करण्यात येणार्‍या या सर्वेक्षणाची सुरूवात मंगळवारी झाली. सर्वेक्षणासाठी ऑनलाईन अ‍ॅपचा वापर करण्यात येत आहे. प्रगणक सर्वेक्षणासाठी घरात गेले, मात्र अ‍ॅपमध्ये नोंदणी करता आली नाही. काही तालुक्यात नोंदणी करीत असताना गावंच दिसत नसल्याचे स्पष्ट झाले. प्रगणकांची ज्या गावात नियुक्ती करण्यात आली. ते गाव अ‍ॅपमध्ये नसल्याने भंबेरी उडाली.

अनेक गावांमध्ये सर्व्हर डाऊन झाल्याने दुपारी तीन वाजल्यानंतर सर्वेक्षणाचे काम थांबले. त्यामुळे अनेकांना तांत्रिक गोष्टींचा सामना करावा लागला. त्यामळे तीन साडेतीनपर्यंत बसूनच राहावे लागले. त्यानंतर साडेतीन वाजता अ‍ॅप सुरु होईल, असे सांगण्यात आले. परंतु ते सुरु झाले नाही. त्या शेवटी त्यांना परिसर बघून घ्या आणि उद्या सर्वेक्षण करा, अशा सूचना वरिष्टांकडून देण्यात आल्या. मराठा मागासलेपणाचा सर्वेक्षण सात दिवसात करण्यात येणार असताना कामात अडथळा निर्माण होत असल्याने त्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

 

अ‍ॅपबाबत मागासवर्ग आयोगाकडे तक्रार

मराठा सर्वेक्षणाचे काम सुरु झाले आहे. मात्र काही गावं दिसत नसल्याच्या तक्रारी तालुक्यातून आल्या आहेत. याशिवाय अ‍ॅपमध्ये नोंदणीही होत नसल्याचे तहसिलदारांकडून सांगण्यात आले आहे, याबाबतची गंभीर दखल घेवून राज्य मागासवर्ग आयोगाकडे तक्रार करण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज