rajkiyalive

vita murdar news : विट्यात किरकोळ बाचाबाचीतून युवकाचा निर्घृण खून

जनप्रवास/विटा

vita murdar news : विट्यात किरकोळ बाचाबाचीतून युवकाचा निर्घृण खून : दारु पिल्यानंतर एकमेकांशी बोलत असताना झालेल्या बाचाबाचीतुन रागाने चिडून एका युवकाचा किरकोळ वादावादीतून चाकूने निर्घृण खून झाला. प्रितम ऊर्फ चिक्या संजीव भिंगारदेवे (वय 27, रा. 100 फुटी रोड नेहरुनगर विटा, ता.खानापूर, जि.सांगली) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून या खूनप्रकरणी संदीप ऊर्फ तात्या साहेबराव पवार (रा.तडसर ता.कडेगाव सध्या रा. नेवरी रोड विटा, ता.खानापूर, जि.सांगली) यास विटा पोलिसांनी अटक केली.

vita murdar news : विट्यात किरकोळ बाचाबाचीतून युवकाचा निर्घृण खून

भरदिवसा विटयात एका युवकाचा निर्घृण खून झाल्याने विटा परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मृताची पत्नी सौ. गिता प्रितम भिंगारदेवे यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विटा – मायणी रस्त्यालगत असणार्‍या पृथ्वीराज वाईन शॉप समोर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास प्रितम ऊर्फ चिक्या भिंगारदेवे आणि संदीप ऊर्फ तात्या पवार यांच्यात किरकोळ कारणावरून वादावादी सुरू झाली. त्यावेळी झालेल्या बाचाबाचीतुन रागाने चिडुन संदीप ऊर्फ तात्या पवार याने मोटारसायकलला अडकविलेल्या पिशवीतील चाकुने फिर्यादीचे पती प्रितम ऊर्फ चिक्या याच्या पोटात भोकसुन गंभीर जखमी करुन त्यांचा खुन केला.

यात प्रितम ऊर्फ चिक्या भिंगारदेवे हा गंभीररीत्या जखमी झाला. त्यानंतर या खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रितम ऊर्फ चिक्या भिंगारदेवे यास नागरिकांनी विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र चिक्या उर्फ प्रीतमचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शरद मेमाणे व सहायक पोलीस निरीक्षक जालींदर पळे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला.

या खळबळजनक खुनाच्या घडनेनंतर विटा पोलिसांनी तातडीने आरोपी संदीप ऊर्फ तात्या पवार यास ताब्यात घेतले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जालींदर पळे करीत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज