इस्लामपूर दि.14 प्रतिनिधी
इस्लामपूर (कापुसखेड नाका) येथील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन येथे श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील आरोग्य केंद्र (ओपीडी) : कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या वतीने कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठ,कृष्णा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या विशेष सहकार्याने Òकेले जात आहे. या केंद्रातून इस्लामपूर शहरासह वाळवा,शिराळा आणि पलूस तालुक्यातील लोकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा सवलतीच्या दरात दिल्या जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते सोमवार दि.16 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता आरोग्य केंद्राचा उदघाटन सोहळा संपन्न होत आहे.
इस्लामपूर (कापुसखेड नाका) येथील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन येथे श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील आरोग्य केंद्र (ओपीडी)
य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले या समारंभाचे प्रमुख पाहुणे असून राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. सध्या आरोग्य खर्च महागडा आणि सर्व सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर होत चालला आहे.
त्यामुळे सर्व सामान्य माणसा ला आधार देण्यासाठी माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून आणि युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या प्रयत्नातून हे आरोग्य केंद्र उभारले जात आहे. येथे कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठ, कृष्णा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरचे तज्ञ डॉक्टर उपलब्ध रहाणार आहेत.
येथे प्राथमिक तपासणी व उपचार केले जाणार असून पुढील तपासण्या,पुढील उपचार व शस्त्रक्रिया कृष्णा हॉस्पिटल येथे केल्या जाणार आहेत. कृष्णेस ने-आण करण्यासाठी रुग्ण वाहिकेचा सुविधा केली आहे. येथे मेडिसिन,सर्जरी, स्त्रीरोग,अस्थि रोग,कान- नाक-घसा,दंत विकार,नेत्र विकार,मनोरुग्ण, रक्त-लघवी तपासण्या आदी सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा मिळणार आहेत. दररोज स. 10 ते सा. 5 बाह्य रुग्ण सेवा मिळणार आहे.
कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शामराव पाटील,सचिव प्राचार्य आर.डी. सावंत,राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील,डॉ.एन.टी.घट्टे,डॉ.प्रकाश म्हाळुंगकर,प्राचार्य मुजावर यांच्यासह राजारामबापू समूहातील पदाधिकारी व कार्यकर्ते याकामी परिश्रम घेत आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.