rajkiyalive

1957 : नागनाथअण्णा, जी. डी. बापू विजयी

दिनेशकुमार ऐतवडे

25 फेब्रुवारी 1957 रोजी झालेली मुंबई प्रांताची ही दुसरी निवडणूक.  प्रांतात 53 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात जतमध्ये विजयसिंह डफळे हे सर्वाधिक 15605 मतांनी तर शिराळा मतदार संघातून यशवंत चंद्रू पाटील हे केवळ 796 एवढ्या कमी मतांनी जिंकले. येथे राजारामबापू पाटील यांचा पराभव झाला.

 

दुसरी पंचवार्षिक निवडणूक 25 फेब्रुवारी 1957 रोजी घेण्यात आली.

या 1952 च्या पहिल्या निवडणुकीनंतर मुंबई प्रांतात लोकशाहीची पाळेमुळे रुजू लागली होती. अनेकांना निवडणुकीविषयी कुतूहल निर्माण होत होते.  दुसरी पंचवार्षिक निवडणूक 25 फेब्रुवारी 1957 रोजी घेण्यात आली.  यावेळी मुंबई प्रांतातील जागा वाढविण्यात आल्या.  पहिल्या निवडणुकीत 268 असणार्‍या जागा एकदम 339 झाल्या. यामध्ये खुल्या वर्गासाठी 266 तर एस. सी. साठी 42 तर अनुसूचित जातीसाठी 31 जागा राखीव ठेवण्यात आल्या.

विटा मतदारसंघ मतदारसंघातून एक राखीव आणि एक खुला

आपल्या भागातील विटा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला.  या मतदारसंघातून एक राखीव आणि एक खुला असे दोन आमदार निवडून यायचे होते.  या निवडणुकीत भगवान नानासाहेब मोरे व म्हडाले पिराजीराव ताव्याप्पा हे दोघे आमदार म्हणून निवडून आले. सांगलीमधून वसंतदादा पाटील यांनी दुसर्‍यांदा बाजी मारली. जतमधून पुन्हा एकदा विजयसिंहराव रामराव डफळे आले. त्यांनी शिवराम सखाराम कोलप यांचा 10261 मतांनी पराभव केला.

हेही वाचा

1952 : पहिल्याच निवडणुकीत वसंतदादांची विधानसभेत एन्ट्री

खुजगावचे धरण आज असते तर…..राजारामबापुंची आठवण

वाळव्यातून नागनाथअण्णा नायकवडी निवडून आले.

मिरजेतून गुंड दशरथ पाटील तर तासगावमधून जी. डी. लाड हे विजयी झाले.  पहिल्या निवडणुकीत लाइ पराभूत झाले होते. वाळव्यातून नागनाथअण्णा नायकवडी आमदार म्हणून निवडून आले. पहिल्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते. शिराळ्यातून यशवंत चंदू पाटील यांनी विजय मिळविला. सांगलीमधून वसंतदादा पाटील यांनी माधव हरी गोडबोले यांचा 14266 मतांनी पराभव केला.  जतमध्ये विजयसिंहराव रामराव डफळे यानी श्रीमती कळंत्रे आक्का यांचा 15605 मतांनी पराभव केला.  पहिल्या निवडणुकीत कळंत्रे आक्का मिरजेमधून निवडून आल्या होत्या. या निवडणुकीत त्या जतमधून उभ्या होत्या.

गतवेळचे पराभूत उमेदवार क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड यांनी विद्यमान दत्ताजीराव भाऊराव सूर्यवंशी यांचा 5404 मतांनी पराभव केला.

पूर्व तासगाव आणि पश्चिम तासगाव मिळून एकच मतदार संघ करण्यात आला.

कवठेमहांकाळ मतदार संघ रद्द झाल्याने तेथील विद्यमान आमदार जी. डी. पाटील यांना मिरज मतदार संघातून उभे करण्यात पूर्व तासगाव आणि पश्चिम तासगाव मिळून एकच मतदार संघ करण्यात आला.  येथून गतवेळचे पराभूत उमेदवार क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड यांनी विद्यमान दत्ताजीराव भाऊराव सूर्यवंशी यांचा 5404 मतांनी पराभव केला.  विट्यातून दोन जागा निवडून द्यायचे होते.  एक राखीव आणि एक खुला त्यामध्ये भगवान नानासाहेब मोरे व म्हडाले पिराजीराव ताय्याप्पा हे दोघे आमदार म्हणून निवडून आले.

पहिल्या निवडणुकीतील इस्लामपूर मतदार संघ हे नाव बदलून वाळवा मतदार संघ झाला.

येथून गतवेळचे पराभूत उमेदवार क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी विद्यमान आमदार एस. डी. पाटील यांचा 9623 मतांनी पराभव केला. स्वातंत्र्यसैनिकांचा विजय 1952 च्या पहिल्या निवडणुकीत सांगलीतून स्वातंत्र्यैनिक वसंतदादा पाटील यांच्याशिवाय दुसर्‍या कोणालाही विजय मिळविता आला नव्हता.  सांगलीतून अण्णा बाबुराव देवर्षी मिरजेतून घोडिराम माळी, तासगावमधून जी. डी. लाड आणि इस्लामपूरमधून नागनाथअण्णा नायकवडी यांना पराभव पत्करावा लागला होता. परंतु 1957 च्या या दुसर्‍या निवडणुकीत नागनाथअण्णा नायकवडी आणि जी. डी. बापू लाड या स्वातंत्र्यसैनिकांनी विजयश्री खेचून आणली,

राजारामबापू पाटील यांचा केवळ 796 मतांनी पराभव

वाळवा शिराळा असे नामकरण असणारा मतदार संघ या निवडणुकीत केवळ शिराळा मतदार संघ असे ओळखला जावू लागला. येवून यशंवतराव चंदू पाटील यांनी राजारामबापू पाटील यांचा केवळ 796 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत आठपैकी सांगली आणि मिरजेतून वसंतदादा पाटील आणि गुंड दशरथ पाटील हे दोघेचे निवडून आले. विजयसिंह डफळे सरकार हे जतमधून अपक्ष तर वर्कर्स पार्टीचे नागनाथअण्णा नायकवडी, जी.डी. लाड, भगवान नानासाहेब मोरे आणि यशवंत चंदू पाटील हे निवडून आले. विट्यातून म्हडाले पिराजीराव ताय्याप्मा हे ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन पक्षातर्फे निवडून आले.

हेही वाचा

जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार

वारसा असूनही… न झालेले आमदार…

सांगा ‘सरकारांनी’ करायचं काय?

गुजरात आणि महाराष्ट्रातील आमदारांचा संघर्ष जोरदार उफाळून येत होता.

वाळवा तालुक्यातील कासेगावचे राजारामबापू पाटील यांचा पहिल्याच निवडणुकीत पराभव हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले.
पहिल्या निवडणुकीत पराभूत झालेले नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. लाड यांनी निवडणुकीतील चुका टाळून दुसर्‍या निवडणुकीत बाजी मारली. काँग्रेसच्या विरोधात पर्यायाने दादांच्या विरोधात त्यांचे राजकारण सुरू होते. वर्कर्स पार्टीच्या तिकीटावर उमे असेलेले हे दोघे पूर्णपणे काँग्रेसच्या विरोधात होते. या विधानसभेत गुजरात आणि महाराष्ट्रातील आमदारांचा संघर्ष जोरदार उफाळून येत होता.

मुंबई आणि बेळगावसह सीमा भागासाठी जोरदार रणकंदण सुरू होते.

प्रांतवार रचनेला गती आली होती. राज्यातील मातब्बर मंडळी आपआपली संस्थांने शाबूत ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत होते. बहुतांश भागात स्वातंत्र्यसैनिकांनी आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली होती.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज