rajkiyalive

jain samaj news : पंचकल्याणक महोत्सवात चोरी करणारी महिलांची टोळी जेरबंद

jain samaj news : पंचकल्याणक महोत्सवात चोरी करणारी महिलांची टोळी जेरबंद : मिरज तालुक्यातील दुधगाव येथील पंचकल्याणक महोत्सवात महिलेचे दागिने चोरणार्‍या कोल्हापूर आणि सांगलीतील महिलांच्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या चार महिलांकडून चोरीतील दागिने जप्त करण्यात आले आहेत. सांगली ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली.

jain samaj news : पंचकल्याणक महोत्सवात चोरी करणारी महिलांची टोळी जेरबंद

कोल्हापूर, सांगलीतील महिलांना केली अटक.

सौ. लक्ष्मी बाळू सकट (रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर), सौ. दीपाली किशोर काळे (वय 40 रा. संभाजीनगर, जयसिंगपूर), सौ. सोनू हरी काळे (वय 35 रा. सांगली) आणि सौ. शारदा बंटीनाथ हातळगे (वय 45 रा. जयसिंगपूर) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, दुधगाव मध्ये पंचकल्याणक महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात बोलवाड येथील फिर्यादी शकुंतला शशिकांत पाटील या पूजेसाठी आल्या होत्या. यावेळी जेवण विभागातून शकुंतला या जेवण करून हात धुण्यासाठी गेल्या असता त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरटयांनी हातोहात लंपास केले होते. याबाबत शकुंतला यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार एक पथक संशयितांच्या मागावर होते. यावेळी पथकाला माहिती मिळाली कि, या गुन्ह्यातील चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी संशयित महिला या बुधगाव हायस्कुल जवळ येणार आहेत. मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी सापळा रचून संशयित चौघींना ताब्यात घेतले.

jain-samaj-news-gang-of-women-caught-stealing-during-panchakalyanak-festival

यावेळी त्यांची चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. यावेळी त्यांच्याकडून चोरीतील अडीच तोळे वजनाचे दागिने जप्त केले आहेत. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक किरण चौगले, उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे, मेघराज रुपनर, अभिजित पाटील, बंडू पवार, सचिन कोळी, मनोज निळकंठ, हिम्मत शेख, मनीषा कोरे यांच्या पथकाने केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज