rajkiyalive

SANGLI LOKSABHA : काकांच्या पराभवावरुन पदाधिकार्‍यांमध्ये जुंपले, बंद खोलीत वाभाडे, भाजपच्या विचार मंथन बैठकीत सारवासारव

जनप्रवास । प्रतिनिधी

SANGLI LOKSABHA : काकांच्या पराभवावरुन पदाधिकार्‍यांमध्ये जुंपले, बंद खोलीत वाभाडे, भाजपच्या विचार मंथन बैठकीत सारवासारव : सांगली ः सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवावरुन तब्बल सात तास चिंतन करण्यात आले. सांगली लोकसभेच्या पराभवावरून पदाधिकार्‍यांमध्ये चांगलीच जुंपली. पक्ष निरीक्षक खासदार धनंजय महाडीक आणि अतुल भोसले यांच्याकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा बंद खोलीत आढावा घेण्यात आला. मराठा, दलित आणि मुस्लिम समाजाची मते विखुरल्याने पराभवाला सामोरे जावे लागल्याचे म्हणणेही नेत्यांनी मांडले.

SANGLI LOKSABHA : काकांच्या पराभवावरुन पदाधिकार्‍यांमध्ये जुंपले, बंद खोलीत वाभाडे, भाजपच्या विचार मंथन बैठकीत सारवासारव

याशिवाय निवडणुकीतील कामांवरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली. या बैठकीचा अहवाल प्रदेश भाजपकडे पाठविला जाणार आहे. येथील खरे सांस्कृतिक भवनमध्ये लोकसभा निवडणूक 2024’ च्या विचार मंथन बैठक निरीक्षक खा. महाडीक, लोकसभा मतदारसंघ प्रभारी अतुल भोसले, पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, माजी खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबतची माहिती निरीक्षकांकडून सविस्तर घेतली.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील नेत्यांशी बंद खोलीत सविस्तर चर्चा केली. निवडणुकीतील मते कमी पडल्याबाबतची कारणेही जाणून घेण्यात आली. काही नेत्यांकडून मराठा, दलित आणि मुस्लिम मते विभागली गेल्याने निवडणुकीत फटका बसल्याचे कारण दिले. पक्षाच्या संघटनेकडून अपेक्षित काम झाले नसल्याचा ठपकाही ठेवण्यात आला, तर काही मंडळींनी उमेदवाराच्या विरोधात काम केल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधन केले. आपल्याला निवडणुकीत जरी अपयश आले असले तरी खचून न जाता जोमाने काम करायचे आहे. नेमके कोणकोणत्या मुद्द्यांवर आपण मागे पडलो, भविष्यात आणखीन कोणत्या सुधारणा करणे आवश्यक आहे, या मुद्द्यांवरही चर्चा झाली. येणार्‍या काळात मतदारसंघाच्याबाबतीत त्या भूमिकांमध्ये सुधारणा करण्याचा संकल्प केला.

जतचे तम्मनगौडा रवि-पाटील यांनी जत विधानसभा मतदारसंघात आ. गोपीचंद पडळकर यांनी तयारी सुरु केली असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांचा खानापूर-आटपाडी मतदारसंघ आहे. तेथे त्यांना नाकारले आहे का? त्यामुळे जतमधून निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, लोकसभा मतदारसंघ प्रमुख दीपक शिंदे-म्हैसाळकर, तम्मनगौडा रवि-पाटील, डॉ. रवींद्र आरळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पृथ्वीराज देशमुख शेवटी आले अन् निघूनही गेले

भाजपच्या विचार मंथन बैठकीला माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हे उशिरा आले. काही वेळ थांबले आणि निरीक्षकांच्या काही तरी सांगून काही वेळातच निघून गेले. लोकसभा निवडणुकीत माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी पक्षविरोधात काम केले नसल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र विचार मंथन बैठकीच्या शेवटी देशमुख आले अन् लगेच निघूनही गेले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज