rajkiyalive

tamdalge murdar news : तमदलगेत सख्ख्या भावानेच दिली खुनाची सुपारी

tamdalge murdar news : तमदलगेत सख्ख्या भावानेच दिली खुनाची सुपारी ; तमदलगे (ता. शिरोळ) येथील बसवान खिंड परिसरात डोंगरामध्ये झालेल्या खुनाच्या गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर व जयसिंंगपूर पोलिसांनी लावला आहे. मृत अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा पाटील याच्या सख्ख्या भावानेच सहा लाख रूपयाची सुपारी देवून खुन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहाजणांना गजाआड केले आहे.

tamdalge murdar news : तमदलगेत सख्ख्या भावानेच दिली खुनाची सुपारी

खुनाच्या गुन्ह्याचा छडा; पोलिसांनी आवळल्या सहाजणांच्या मुसक्या

मृत अविनाश याचा भाऊ जिनगोंडा ओमगोंडा पाटील (वय 37, रा. सांगली बायपास रोड, गौंडाप्पा मळा, निमशिरगाव, ता. शिरोळ), मोहन प्रकाश पाटील (वय 33, रा. सांगली बायपास रोड, नायरा पेट्रोल पंप जवळ, निमशिरगाव), राकेश उर्फ विनोद वसंत थोरात (वय 23, रा. धनगर वाडा, कुंभोज रोड, दानोळी), किरण आमान्ना थोरात (वय 27, रा. नवीन पाण्याची टाकी, धनगर वाडा, दानोळी), सागर भिमराव लोहार (वय 30, रा. दिलदार चौक, भादोले, ता. हातकणंगले), अमर रामदास वडर (वय 33, रा. दिलदार चौक, भादोले, ता. हातकणंगले) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, दि. 27 मे रोजी सकाळी तमदलगे येथे बसवान खिंडीत डोंगरावर अविनाश उर्फ दिपक ओमगोंडा पाटील याचा मृतेदह आढळला होता. त्याचा अज्ञात इसमाने शस्त्राने खुन केलेला होता. याबाबत जयसिंगपूर पोलिसांनी अज्ञाताविरूध्द खुनाचा गुन्हा नोंद केला होता. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी जयसिंगपूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना तपासाच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हे शाखेकडील एकुण 3 पथके सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहीती घेण्यासाठी नेमण्यात आली. तसेच सदर तपासकामी जयसिंगपूर पोलीस स्टेशनकडील 2 पोलीस पथके अशी एकुण 5 पथके नेमण्यात आली होती.

सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना तपास पथकास मयताचा भाऊ जिनगोंडा याचेवर संशय आलेने त्यांच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली. त्याने सख्खा भाऊ अविनाश हा दररोज दारु पिवुन घरी भांडण करुन त्याच्या मुलांना पत्नीला मारहाण करीत असल्याने या कृत्याला कंटाळुन त्याने आपला मित्र मोहन पाटील यास सांगितले. त्यानंतर मोहन याने राकेश थोरात यास बोलावुन घेवुन अविनाश पाटील याला ठार मारण्याचे आहे, असे सांगीतले. त्यावर राकेश याने अविनाश यास मारणेसाठी 6 लाख रुपयांची मागणी केली. यावर जिनगोंडा पाटील याने भाऊ अविनाश यास ठार मारायच्या आधी 3 लाख व मारलेनंतर 3 लाख रुपये देण्याचे कबुल केले.

यानंतर जिनगोंडा याने ठरल्याप्रमाणे राकेश थोरात यास मोहन पाटील याच्या मध्यस्थीने 3 लाख रुपये दिले. त्यानंतर राकेश याने अविनाश यास ठार मारणेकरीता त्यांचे सहकारी मित्र किरण थोरात, सागर लोहार, अमर वडर याना सोबत घेवुन अविनाश याचेवर पाळत ठेवली. आरोपींनी संगनमत करुन दि.26 मे 2025 रोजी रात्री तमदलगे गावचे हद्दीत बसवान खिंडीत निर्जन डोंगरात नेवुन अविनाश याच्या डोक्यात दगड घालुन निघृण खुन केल्याची कबुली दिली.

त्यानंतर जयसिंगपूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांनी समांतर तपास यंत्रणा राबवुन आरोपींना निमशिरगाव, दानोळी व भादोले (ता. हातकणंगले) येथुन शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे खुनाच्या गुन्हा अनुषंगाने तपास केला असता आरोपींनी अविनाश यांच्या खुन केल्याची कबुली दिल्याने आरोपींना जयसिंगपुर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.

tamdalge-murdar-news-in-tamdalge-a-close-relative-gave-the-order-for-murder

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील,उप विभागीय पोलीस अधिकारी रोहीणी सोळंखेे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, सहायक पोलीस निरीक्षक दीपक कदम, पोसई प्रवीण माने, पोसई युनुस इनामदार, स्था. गु.शा कोल्हापुर कडील पोसई शेष मोरे, पोसई जालिंदर जाधव, पोसई राजीव शिंदे जयसिंगपुर पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार सहा. फौजदार विजय गुरखे, निलेश मांजरे, ताहीर मुल्ला, वैभव सुर्यवंशी, बाळासाहेब गुत्ते कोळी, स्था. गु.अ. शाखा, कोल्हापुर यांचेकडील पोलीस अंमलदार नामदेव यादव, संजय कुंभार, महेश पाटील, नवनाथ कदम, दिपक घोरपडे, समीर कांबळे, गजानन गुरव, अमीत सर्जे, महेश खोत, विशाल चौगुले, सागर माने, प्रदीप पाटील, महेद्र कोरवी, राजेंद्र व्हरंडेकर, महादेव कुन्हाडे व सुशील पाटील यांनी केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज