rajkiyalive

JAYANT PATIL : शरद पवार साहेब झुकत नाहीत म्हणून त्रास दिला जात आहे*

JAYANT PATIL : शरद पवार साहेब झुकत नाहीत म्हणून त्रास दिला जात आहे**लोकसभा आणि विधानसभेला झाडून काम झाले पाहिजे* *राष्ट्रवादी विजय निश्चय दौर्‍यात जयंत पाटील यांनी भरला हुंकार*

 

JAYANT PATIL : शरद पवार साहेब झुकत नाहीत म्हणून त्रास दिला जात आहे

सातारा :- शरद पवार साहेब झुकत नाहीत म्हणून ते नको आहेत, साहेब हो म्हणत नाहीत म्हणून त्यांचा त्रास होत आहे, साहेब तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागत नाहीत म्हणून अडचण केली जात आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधारी पक्षावर केला.

आजपासून राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी विजय निश्चय दौर्‍याची सुरुवात सातारा जिल्ह्यातील पाटण येथून झाली. यावेळी जयंत पाटील बोलत होते.

लोकांना फोडाफोडी करून सत्तेत जाण्याचा मोह हा काही कमी होताना दिसत नाही.

जयंत पाटील उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, महाराष्ट्रात ज्या ठिकाणी आपण लोकसभेच्या जागा लढवणार आहोत, त्या सर्व ठिकाणांचा दौरा पाटणपासून सुरू केलेला आहे. पुढे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. आपला पक्ष फुटून काही सहकारी सत्तेत सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रामध्ये जी राजकीय संस्कृती होती, ती यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेली होती. पण आज महाराष्ट्राची संस्कृती बिघडलेली आहे आणि लोकांना फोडाफोडी करून सत्तेत जाण्याचा मोह हा काही कमी होताना दिसत नाही. सत्ता व पैसा याचे एक विचित्र सूत्र आणि नातं महाराष्ट्रात सत्तेत बसणार्‍या लोकांनी तयार केलेले आहे असे म्हटले.

आमदारांच्या जमिनीत जर कोणी दुसरा घुसला तर त्याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो

राज्याच्या कायदा सुव्यवस्थेबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, व्यवसायिक व्यवसाय करतात हे समजू शकतो. पण आता आमदारही व्यवसायिक झालेले आहेत, ते सुद्धा जमिनी खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. आमदारांच्या जमिनीत जर कोणी दुसरा घुसला तर त्याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो व सकाळी बातमी येते की ज्यांनी गोळीबार केले त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलेले आहे. महाराष्ट्रातच नाही तर बिहारमध्ये देखील पोलीस स्टेशनमध्ये कधी गोळीबार झाला असेल, असे मला वाटत नाही. आपण म्हणायचो की कुठे नेलाय महाराष्ट्र? महाराष्ट्राचा काय बिहार करणार आहे का? आता ते वाक्य रद्द करा महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे. त्यांची सुधारणा झाली आहे पण आमची अधोगती एवढी झाली आहे की एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री राज्याला आहे पण यांना राज्य आवरत नाही अशी यांची परिस्थिती आहे. राज्य करणार्यांचा लोकांवर, कार्यकर्त्यांवर व सत्तेत असलेल्या आमदारांवर कोणताही प्रभाव नाही याचे हे उत्तम उदाहरण आहे असा टोला त्यांनी लगावला.

सत्तेमधलेच मंत्री एक दुसर्‍याला खालच्या पातळीची भाषा वापरत आहेत,

सत्तेत असणार्‍या सगळ्यात मोठ्या पक्षाचा आमदार मुख्यमंत्र्यांच्या संघटनेतील पदाधिकार्‍यावर गोळीबार करतो आणि त्यानंतर मुलाखत देताना सांगतो की मुख्यमंत्र्यांनी आपल्या काळामध्ये गुन्हेगार घडवण्याचे काम केलेले आहे व मुख्यमंत्र्यांना मी कोट्यावधी रुपये दिलेले आहेत त्यांनी माझ्याकडून करोडो रुपये घेतले आहेत, आता एऊ कोणाकडे गेली पाहिजे? सत्तेमधलेच मंत्री एक दुसर्‍याला खालच्या पातळीची भाषा वापरत आहेत, हे काय चाललंय महाराष्ट्रात? असा सवाल त्यांनी केला.

निवडणुका लागतील म्हणून घाई गडबडीने श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली

आजपर्यंत महाराष्ट्रात रस्त्यांच्या उद्घाटनाला फार मोठी लोक आलेली पाहिलेली नाहीत, आम्हीच करायचो. पण आता महाराष्ट्रातल्या कुणालाही संधी नाही एकच उद्घाटक आहेत. राम मंदिरासाठी जगातील लोकांनी मनी ऑर्डरने पैसे पाठवले अजून कळस बांधण्याचा बाकी आहे, पण निवडणुका लागतील म्हणून घाई गडबडीने श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला.

आज महाराष्ट्रातील लहान मुलालाही कळत आहे की लोक पक्ष सोडून का जात आहेत.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्यानंतरही भारतीय जनता पक्षाची मतांची बेरीज होत नाही हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. महाविकास आघाडीची मते आजही अनेक मतदारसंघात अधिक आहेत. रामराज्य व्हावे हे सामान्य माणसाच्या मनामध्ये होते ते आहे का? याचा विचार करायला पाहिजे. आदरणीय शरद पवार साहेब झुकत नाहीत म्हणून ते नको आहेत, साहेब हो म्हणत नाहीत म्हणून त्यांचा त्रास होत आहे, साहेब तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागत नाहीत म्हणून त्यांची अडचण होते म्हणून आज त्यांच्या स्वाभिमानामागे ठामपणाने उभे राहणे ही सर्वांची परीक्षा आहे असे ते म्हणाले.

येणारा काळ हा आपल्या सर्वांच्या परीक्षेचा आहे, या परीक्षेला आपण सर्वांनी उतरले पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून सत्यजीत पाटणकर यांच्या पाठीशी कायम उभे राहायचे आहे. लोकसभा आणि विधानसभेला झाडून काम झाले पाहिजे, आपण सर्वांनी सक्षमपणाने पक्षाचे काम सुरू केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज