rajkiyalive

SANGLI LOKSABHA : चंद्रहार पाटील सोमवारी ‘वंचित’ तर मंगळवारी शिवसेनेकडे

जनप्रवास । सांगली
SANGLI LOKSABHA : चंद्रहार पाटील सोमवारी ‘वंचित’ तर मंगळवारी शिवसेनेकडे : सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून विकास महाआघाडीत तिढा निर्माण झाला आहे. यातच लोकसभेसाठी इच्छूक असलेले उमेदवार चंद्रहार पाटील यांना सोमवारी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली अशी चर्चा असताना त्यांनी पुन्हा मंगळवारी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यामुळे महाविकास आघाडीत आणखी गोंधळ वाढला आहे.

SANGLI LOKSABHA : चंद्रहार पाटील सोमवारी ‘वंचित’ तर मंगळवारी शिवसेनेकडे

सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे राहणार की शिवसेना अथवा वंचित आघाडीला जाणार, याची चर्चा गेल्या आठवड्यापासून सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी चंद्रहार पाटील यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर झाली असल्याच्या चर्चेला उधाण आली. पण वंचितने उमेदवारी जाहीर केले नसल्याचा खुलासा केला. मंगळवारी पुन्हा ही जागा शिवसेनेला (उबाठा) ला सोडल्याचे वृत्त सांगलीत धडकले. शिवाय चंद्रहार पाटील यांनी ‘मातोश्री’ गाठून शिवसेनेत प्रवेश केल्याच्या चर्चेला उधाण आले.

मात्र त्यांनी चंद्रहार पाटील यांनी वृत्त फेटाळले. शिवसेनेने ही जागा घ्यावी, मला उमेदवारी द्यावी, अशी मागणी चंद्रहार पाटील शिवसेनेचे उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. महाविकास आघाडीची बुधवारची बैठक होवू द्या. त्यानंतर पुढचा निर्णय ठरवू. सांगलीबाबत निर्णय झाला आणि ती आपल्याकडे जागा आली तर तुमच्या उमेदवारीचा निर्णय घेवू, असा शब्द उध्दव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना दिल्याचे वृत्त आहे.

कोल्हापूर आमच्या हक्काचा: संजय राऊत

संजय राऊत यांनी कोल्हापूर मतदारसंघाबाबत महत्वाची भूमीका मांडली. ते म्हणाले, कोल्हापुरात शिवसेनेची साडेतीन लाख हक्काची मते आहेत, कोल्हापूर मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि तो आम्ही लढवणार आहोत. शाहू महाराजांनी मशाल हाती घ्यावी, असे आवाहन त्यांनी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या बदल्यात सांगली’ या प्रस्तावाचे नेमके काय होणार? याची चर्चा रंगली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज