rajkiyalive

SANGLI LOKSABHA : सांगली लोकसभेच्या जागेबाबत अंतिम निर्णय नाही

इस्लामपूर ः प्रतिनिधी
SANGLI LOKSABHA : सांगली लोकसभेच्या जागेबाबत अंतिम निर्णय नाही : सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोणाला मिळेल याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. याबाबत सुरू असलेल्या उलट सुलट चर्चेत माझा काही संबंध नाही. असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी केला. कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेसतर्फे छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे सांगली व हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मिळावा म्हणून शिवसेना (उ.बा.ठा.) दावा केला आहे. मुलगा प्रतीक पाटील यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मौन पाळणे पसंत केले.

SANGLI LOKSABHA : सांगली लोकसभेच्या जागेबाबत अंतिम निर्णय नाही

प्रतीक पाटील यांच्या उमेदवारीबाबत मौन

माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील पत्रकारांशी संवाद साधला. आ.जयंत पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे दोन खासदार आहेत. परंतू ते सध्या उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडे नाहीत. त्यामुळे त्या दोन्ही जागावर शिवसेनेच्या (उ.बा.ठा.) गटाने दावा सांगितला आहे. परंतू सध्यस्थितीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढविणार आहेत.

त्यामुळे शिवसेनेची 1 जागा कमी होत असून कोल्हापूरच्या बदल्यात सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडून मागितला जात आहे. परंतू सांगलीची जागा काँग्रेसकडे रहावी असा आग्रह काँग्रेसच्या नेत्यांचा आहे. हातकणंगले मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा पुढील आठवड्यात चर्चेतून मार्ग निघेल. राज्यात महाविकास आघाडीला सर्वसामान्य जनतेचा चांगला प्रतिसाद आहे. लोक उर्त्स्फुतपणे आमच्या पाठीशी राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज